शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रावर पुन्हा तिरंगा फडकणार; ISRO ने सुरू केली Chandrayaan-5 मोहिमेची तयारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 21:58 IST

ISRO Chandrayaan-5 :केंद्र सरकारने चांद्रयान-5 मोहिमेला परवानगी दिली आहे.

ISRO Chandrayaan-5 : गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. चांद्रयान, सूर्ययान आणि गगनयानासारख्या मोहिमांद्वारे भारत आपली ताकद संपूर्ण जगाला दाखवत आहे. आतापर्यंत ISRO च्या सर्व चांद्रयान मोहिमांनी चंद्राविषयी नवनवीन शोध लावले आहेत. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व शोधणे असो किंवा जगात पहिल्यांदाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे असो. चांद्रयान मोहिमांमुळे नेहमीच भारतीय तिरंगा जगभरात उंचावला गेला आहे. अशातच आता भारताने चांद्रयान-5 मिशनची तयारी सुरू केली आहे.

केंद्र सरकारने चांद्रयान-5 मोहिमेला नुकतीच परवानगी दिल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना उतरवण्याच्या भारताच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

भारताची चांद्रयान-5 मोहीम काय आहे?इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणतात की, भारताने 2040 पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर मानव उतरवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारताची क्षमता वाढवण्यासाठी चांद्रयान-5 मिशन पाठवले जाईल. एवढेच नाही तर भारताने 2035 पर्यंत स्वतःचे स्पेस स्टेशन विकसित करण्याचेही लक्ष्य ठेवले आहे. चांद्रयान-5 मोहिमेला सरकारने मंजुरी दिली आहे. यात 350 किलो वजनाचा रोव्हर असेल. या मोहिमेवर भारत आणि जपान एकत्र काम करणार आहे.

चांद्रयान-5 पूर्वी भारताला चांद्रयान-4 मिशन पाठवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करण्यासाठी ते पाठवले जाणार आहे. सरकारने चांद्रयान-4 मोहिमेला गेल्या वर्षीच मान्यता दिली होती. चंद्रावर सुरक्षित लँडिंग आणि त्यानंतर सुरक्षित परतण्यासाठी क्षमता वाढीसाठी हे अभियान पूर्ण करायचे आहे. याशिवाय, नमुने गोळा करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे हे उद्दिष्ट आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीच भारताने 3 चांद्रयान मोहिमा यशस्वी केल्या आहेत. भारताची चांद्रयान-3 मोहीम ही जगातील पहिली चंद्र मोहीम होती, ज्यामध्ये रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. या मोहिमेद्वारे भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याची क्षमताही तयार केली आहे.

भारत 2035 पर्यंत अंतराळात मानव पाठवणार चांद्रयान आणि मंगळयान या मोहिमांसह भारत गगनयान मोहिमेवरही काम करत आहे. 2035 पर्यंत मानवाला अवकाशात पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करण्याचेही लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या फक्त 3 देश स्वतःचे स्पेस स्टेशन बनवू शकले आहेत, ज्यात अमेरिका, रशिया आणि चीनचा समावेश आहे. आता लवकरच यात भारताचे नाव जोडले जाईल.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3NASAनासाIndiaभारत