शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

“गाझापट्टीतील संघर्ष सोडवण्यासाठी भारताने हस्तक्षेप करायला हवा”; पॅलेस्टाइनचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 23:02 IST

Israel Hamas Conflict: इस्रायलच्या धोरणांमुळे हा संघर्ष दिसत असून, याला आंतरराष्ट्रीय समुदाय जबाबदार असल्याची टीका करण्यात आली आहे.

Israel Hamas Conflict: गाझापट्टीत हमास आणि इस्रायल यांच्यात प्रचंड संघर्ष पाहायला मिळत आहे. या संघर्षात अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. इस्राइली सैन्याने हमासचे ४७५ रॉकेट सिस्टिम आणि ७३ कमांड सेंटर उद्ध्वस्त केले आहेत. तसेच इस्राइलच्या हद्दीत घुसलेल्या हमासच्या १५०० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून, त्यांचे मृतदेह इतरत्र पडले आहेत, असा दावा इस्राइलमधील स्थानिक माध्यमांनी केला आहे. या प्रचंड संघर्षात आता पॅलेस्टाइनकडूनभारताला महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. 

भारत इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांचाही मित्र देश आहे आणि गाझा पट्टीतील सध्याचे संकट सोडवण्यासाठी भारताने हस्तक्षेप केला पाहिजे, असे पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अबू अलहैजा यांनी म्हटले आहे. हमासचा इस्रायवरील हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याचे भारताने म्हटले आहे. तसेच हमासच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर अबू अलहैजा यांनी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे. 

या युद्धाला आंतरराष्ट्रीय समुदाय जबाबदार

राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या सरकारने नियुक्त केलेले पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अबू अलहैजा यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जे काही सुरू आहे, ती इस्रायलच्या धोरणांवरील प्रतिक्रिया आहे. या युद्धाला आंतरराष्ट्रीय समुदाय जबाबदार आहे. युनायटेड नेशन्सने पॅलेस्टाईनच्या संदर्भात ८०० ठराव पारित केले. मात्र, इस्रायलने एकही ठराव मान्य केला नाही. इस्रायलने पॅलेस्टाईनच्या जमिनीवरील नियंत्रण काढले तर हल्लेही थांबतील, असे अलहैजा यांनी म्हटले आहे.

भारताने यात हस्तक्षेप करून चर्चेसाठी मदत करावी 

पॅलेस्टाईन सामान्य नागरिकांच्या हत्येच्या विरोधात आहे आणि आम्हाला या संकटावर शांततापूर्ण तोडगा हवा आहे. आमचे राष्ट्राध्यक्ष याबाबत अनेक युरोपीय देशांच्या संपर्कात आहेत. भारत हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांचा मित्र आहे. अशा परिस्थितीत भारताने यात हस्तक्षेप करून चर्चेसाठी मदत करावी, अशी आमची इच्छा आहे, असे अबू अलहैजा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, इस्रायल हा एकमेव देश आहे जो कधीही आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करत नाही. सन १९९३ मध्ये आमचा करार झाला होता, आम्हाला आशा होती की, आम्ही स्वतंत्र होऊ आणि इस्रायलसोबत शेजारी देश आणि भाऊ म्हणून राहू. पण हे होऊ शकले नाही. पॅलेस्टाईनला कोणतेही अधिकार दिले गेले नाहीत. गाझापट्टी आणि वेस्ट बँकमध्ये आम्ही ६ दशलक्ष लोक राहतो. आम्हाला शांतता हवी आहे. आमच्या मुलांनी इतर मुलांप्रमाणे खेळावे अशी आमची इच्छा आहे. त्यांना मारले जाऊ नये, असे अबू अलहैजा यांनी यापूर्वी म्हटले होते.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलPalestineपॅलेस्टाइनIndiaभारतIndiaभारत