शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:28 IST

India News: ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवून इराणमध्ये नेण्यात आलेल्या आणि तिथून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आलं आहे. भारत सरकारने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि इराणसोबत केलेल्या चर्चेनंतर या भारतीय तरुणांची सुटका करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवून इराणमध्ये नेण्यात आलेल्या आणि तिथून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आलं आहे. भारत सरकारने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि इराणसोबत केलेल्या चर्चेनंतर या भारतीय तरुणांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात या भारतीय नागरिकांचं दक्षिण तेहरानमधील एका कथित पाकिस्तानी टोळक्याने अपहरण केलं होतं. दरम्यान, या भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आल्याची घोषणा ईराणी दूतावासाने मंगळवारी रात्री केली.  दरम्यान, पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय या अपहृत भारतीयांना पाकिस्तानात काम करणारे गुप्तहेर म्हणून दाखवण्याच्या प्रयत्नात होती, असे या प्रकरणाची हाताळणी करणाऱ्या व्यक्तींनी सांगितले. 

गेल्या आठवड्यात इराणमधून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी फोन नंबरवरून खंडणीसाठी फोन आले होते. त्यामुळे या घटनेमागील आयएसआयचा हात उघड झाला होता. १ मे रोजी तेहरान येथे पोहोचल्यानंतर हे तिघेही भारतीय तरूण इराणमधून बेपत्ता झाले होते. संगरूर जिल्ह्यातील हुशनप्रीत सिंह, एसबीएसनगरमधील जसपाल सिंह आणि होशियापूर जिल्ह्यातील अमृतपाल सिंह अशी या तीन अपहृत भारतीयांची नावं होती.

पंजाबमधील एका एजंटने या तिघांनाही दुबई-इराणमार्गे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. आता भारत सरकार या एजंटचा पाकिस्तानशी काही संबंध आहे का याचा शोध घेत आहे. दरम्यान, या तरुणांना ज्याने इराणमध्ये पाठवलं होतं, तो होशियारपूरमधून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :KidnappingअपहरणIndiaभारतIranइराणPakistanपाकिस्तान