शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:28 IST

India News: ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवून इराणमध्ये नेण्यात आलेल्या आणि तिथून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आलं आहे. भारत सरकारने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि इराणसोबत केलेल्या चर्चेनंतर या भारतीय तरुणांची सुटका करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवून इराणमध्ये नेण्यात आलेल्या आणि तिथून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आलं आहे. भारत सरकारने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि इराणसोबत केलेल्या चर्चेनंतर या भारतीय तरुणांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात या भारतीय नागरिकांचं दक्षिण तेहरानमधील एका कथित पाकिस्तानी टोळक्याने अपहरण केलं होतं. दरम्यान, या भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आल्याची घोषणा ईराणी दूतावासाने मंगळवारी रात्री केली.  दरम्यान, पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय या अपहृत भारतीयांना पाकिस्तानात काम करणारे गुप्तहेर म्हणून दाखवण्याच्या प्रयत्नात होती, असे या प्रकरणाची हाताळणी करणाऱ्या व्यक्तींनी सांगितले. 

गेल्या आठवड्यात इराणमधून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी फोन नंबरवरून खंडणीसाठी फोन आले होते. त्यामुळे या घटनेमागील आयएसआयचा हात उघड झाला होता. १ मे रोजी तेहरान येथे पोहोचल्यानंतर हे तिघेही भारतीय तरूण इराणमधून बेपत्ता झाले होते. संगरूर जिल्ह्यातील हुशनप्रीत सिंह, एसबीएसनगरमधील जसपाल सिंह आणि होशियापूर जिल्ह्यातील अमृतपाल सिंह अशी या तीन अपहृत भारतीयांची नावं होती.

पंजाबमधील एका एजंटने या तिघांनाही दुबई-इराणमार्गे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. आता भारत सरकार या एजंटचा पाकिस्तानशी काही संबंध आहे का याचा शोध घेत आहे. दरम्यान, या तरुणांना ज्याने इराणमध्ये पाठवलं होतं, तो होशियारपूरमधून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :KidnappingअपहरणIndiaभारतIranइराणPakistanपाकिस्तान