शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुलांभोवतीही ISI चा फास! कारवायांत सामील करण्याच्या कटाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 14:37 IST

शस्त्र पुरवठ्यासाठी वापर

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये महिला व अल्पवयीन मुले, मुलींना अतिरेकी कारवायांत सामील करून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ व संदेशाचे वहन करण्याच्या अत्यंत धोकादायक कटाचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तचर संस्था व सुरक्षा दलांनी अलीकडेच अतिरेक्यांच्या स्लीपर सेलवर कठोर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि सीमेपलीकडील अतिरेकी संघटनांनी आपल्या कारवायांमध्ये महिला व बालकांना सॉफ्ट टार्गेट बनवल्याचे पुढे आले आहे.

दोन्ही देशांच्या सीमेवर सध्या असलेले शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा नियंत्रण रेषेपलीकडून (एलओसी) प्रयत्न होत असल्याने भारतीय सुरक्षा दलांना आता अधिक सतर्क राहावे लागणार असल्याचे श्रीनगर येथील चिनार कोरचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंह औजाला यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

चकमकींच्या प्रमाणातही घट 

  • काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले व चकमकींचे प्रमाण यावर्षी घटले. हा सकारात्मक संकेत आहे. स्थानिक लोकांचा दृष्टीकोनही खूप बदलला आहे. हाच कायम राखणे ही आता आमची जबाबदारी आहे. 
  • बदलत्या सुरक्षा वातावरणात आता आम्हालाही कार्यप्रणालीमध्ये बदल करावा लागणार आहे. जी-२० बैठक सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांनीही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

संदेशवहनासाठी पारंपरिक साधने

अतिरेक्यांनी कारवाया तडीस नेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. बोलण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी मोबाइलसारख्या साधनांपासून आता ते दूर राहत असून त्यासाठी पारंपरिक साधनांचा उपयोग करीत आहेत. महिला व बालके या जाळ्यात अडकू नयेत, यासाठी सरकार व प्रशासनाच्या सहकार्याने लष्कर जनजागरण मोहीम राबवत आहे.

३३ वर्षांतील अतिरेक्यांची संख्या सर्वांत कमी

भारताने राबवलेल्या इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशनने अतिरेक्यांचे कंबरडे मोडले आहे. बहुतांश अतिरेकी काश्मीर खोऱ्याच्या बाहेर गेले आहेत किंवा उर्वरित हालचालच करू शकत नाहीत. दहशतवादाचे अदृश्य रूप खरे चिंतेचे कारण आहे आणि आम्ही त्यावरही काम करत आहोत; परंतु, अंदाजानुसार अतिरेक्यांच्या संख्येत मागील ३३ वर्षांतील सर्वांत कमी आली आहे.

सुरक्षेत कसलीही कसूर नाही!

पाकिस्तानचे नाव न घेता लेफ्टनंट जनरल औजाला यांनी सांगितले की, काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर घुसखोरीचे प्रमाण कमी झाले; परंतु, पाकिस्तानच्या पीर पंजालच्या दोन्ही बाजूंनी व त्याचबरोबर पंजाबमध्येही घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. सुरक्षा अधिक कडक केली पाहिजे. आम्ही यात कसूर करणार नाही.

टॅग्स :Terrorismदहशतवाद