शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

संघटना मोठी की सरकार? उत्तर प्रदेशात राजकारण तापले; योगी आदित्यनाथ राज्यपालांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 09:18 IST

मौर्य हे मजबूत ओबीसी नेते असल्याने भाजपचे लक्ष ओबीसी व मागासवर्गीयांवर केंद्रित आहे.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत भाजपला ८० पैकी केवळ ३३ जागा जिंकता आल्यावर चिंताग्रस्त केंद्रीय नेतृत्व संघटनात्मक पातळीवर बदल करण्याच्या विचारात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किमान काही काळ तरी पदावर कायम राहू शकतात. पण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांच्या जागी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून परत आणले जाण्याची शक्यता आहे. चौधरी हे पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट नेते आहेत आणि भाजपने आरएलडीशी हातमिळवणी केल्यानंतर चौधरी यांची उपयुक्तता काहीशी कमी झाली आहे. मात्र, त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे.

मौर्य हे मजबूत ओबीसी नेते असल्याने भाजपचे लक्ष ओबीसी व मागासवर्गीयांवर केंद्रित आहे. मौर्य हे २०१६ मध्ये प्रदेशाध्यक्ष होते. मात्र, २०१७ मध्ये त्यांची मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली. तेव्हापासून त्यांचे योगी आदित्यनाथ यांच्याशी मतभेद असल्याचे बोलले जाते.

नेमके काय आहे राजकारण?

nमौर्य यांनी १४ जुलै रोजी लखनौ येथे झालेल्या पक्षाच्या राज्य कार्यसमितीच्या बैठकीत 'संघटन नेहमीच सरकारपेक्षा मोठे असते' असे सांगितले तेव्हाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मौर्य यांच्यातील मतभेदांच्या चर्चा होऊ लागल्या.

nत्यांच्या या वक्तव्याकडे आदित्यनाथ यांच्यावर हल्ला म्हणून पाहिले गेले. जे.पी. नड्डा हेही या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील निवडणुकीतील पराभवासाठी अप्रत्यक्षपणे "अति आत्मविश्वासा" ला जबाबदार ठरविले होते.

बदल कधी?

हे बदल विधानसभेच्या १० जागांच्या पोटनिवडणुकीनंतरच केले जाण्याची शक्यता आहे. भाजप नेतृत्व भलेही योगींवर फारसे खुश नसेल. पण, २०२७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी असे पाऊल अंगलट येऊ शकते. म्हणून बदलाचा धोका नसल्याचे दिसते.

मंत्र्यांवर निवडणूक जिंकण्याची जबाबदारी

लखनौ : विधानसभेच्या १० जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसंदर्भात  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ॲक्शन मोडवर आहेत. बुधवारी त्यांनी ३० मंत्र्यांची बैठक घेतली.

त्यांच्यावर या १० जागा जिंकण्याची जबाबदारी सोपवली आहे. निवडणुका संपेपर्यंत मंत्र्यांना आठवड्यातून दोनदा आपापल्या भागात रात्री मुक्काम करून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवाव्या लागतील.

सोशल मीडियावर मौर्य यांची पोस्ट

nउपमुख्यमंत्री मौर्य यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, संघटना सरकारपेक्षा मोठी आहे. कामगारांची वेदना ही माझी वेदना आहे.

nसंघटनेपेक्षा कोणीही मोठा नाही, प्रत्येक कार्यकर्ता आमचा अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश