शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला मृतदेह, शेजारी फुलं...; जीएसटी अधिकाऱ्याने आई बहिणीसह स्वतःला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:06 IST

केरळमध्ये अधिकारी असलेल्या भाऊ बहिणीने आईसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kerala Crime:केरळच्या कक्कनडमध्ये सेंट्रल एक्साईज स्टाफ क्वार्टरमध्ये आयआरएस अधिकारी आणि त्यांची आई आणि बहिणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. हे कुटुंब झारखंडचे रहिवासी होते. पोलिसांना घरात हिंदीत लिहिलेली एक सुसाईड नोटही सापडली. गुरुवारी तिघांनीही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अधिकाऱ्याच्या इतर कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये मृत्यूनंतर परदेशात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला याबाबत सांगण्याची विनंती करण्यात आली आहे.

आयआरएस अधिकारी मनीष विजय अग्रवाल आणि त्यांची आई आणि बहीण यांचे मृतदेह कोचीजवळील कक्कनड येथील सेंट्रल एक्साइज स्टाफ क्वार्टरमध्ये सापडले आहेत. मनीष विजय अग्रवाल यांची बहीण शालिनी विजय या झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये टॉपर होत्या. तर मनीष विजय केरळमधील कक्कनड येथे सीमाशुल्क विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. शालिनी या झारखंडमध्ये डेप्युटी कलेक्टर पदावर कार्यरत होत्या. दोन वर्षांपूर्वी त्या रजेवर गेल्या होत्या. त्यानंतर त्या ड्युटीवर परतल्या नाहीत. मात्र आता त्यांच्यासह भावाची आणि  आईच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

दुसरीकडे, मनीष विजय हे आठवडाभराच्या रजेवर होते. आठवडाभरानंतर ते कामावर परतणार होते. मात्र ते तिथे गेले नाहीत. त्यांना फोन देखील बंद येत होता. त्याच्याशी संपर्क होत नसल्यामुळे कार्यालयातील कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांच्या घराला आतून कुलूप होते. अनेकवेळा बेल वाजवून दार ठोठावूनही कोणीच दार उघडले नाही. त्यामुळे काहीतरी घडलं असल्याची शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

केरळ पोलिसांना घरात मनीष आणि त्यांच्या बहिणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले.  तर आई शकुंतला यांचा मृतदेह बेडवर पडलेला आढळून आला. मनीष विजय यांच्या आईचा मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला फुले ठेवली होती. मनीष आणि शालिनी यांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळले. आईचा मृत्यू आधी झाला असावा किंवा तिची हत्या केल्यानंतर भाऊ व बहिणीने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आणि शालिनी दोघेही अविवाहित होते. पोलिसांना घरातून हिंदीत लिहिलेली सुसाईड नोट सापडली, ज्यात परदेशात असलेल्या त्यांच्या बहिणीला या घटनेची माहिती द्यावी, अशी विनंती केली होती. गेल्या दीड वर्षांपासून अग्रवाल कुटुंब या क्वार्टरमध्ये राहत होते. शेजाऱ्यांशी त्यांचा जास्त संबंध नव्हता. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कधी कधीच मनीष यांची आई बाहेर दिसत होती. 

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस