शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करा; भाजप खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 16:53 IST

गांधींचे हत्येनंतर शवविच्छेदन का नाही केले, आभा आणि मनू यांची प्रत्यक्षदर्शी म्हणून न्यायालयात फेरतपासणी का नाही झाली, गोडसेच्या बंदुकीतील किती चेंबर रिकामे होते, अशा अनेक प्रश्नांमुळे गांधी हत्येचा तपास पुन्हा एकदा व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सतत गांधीजींविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप पक्षातील नेत्यानेच आता गांधी हत्येची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार सुब्रमण्याम स्वामी यांनी ही मागणी केली आहे. तसेच गांधींना नथुराम गोडसेंने गोळी मारली होती, हे पूर्णपणे सिद्ध झालंच नाही, असंही त्यांनी म्हटले आहे. 

खासदार स्वामींनी ट्विट करून ही मागणी केली आहे. यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. गांधींचे हत्येनंतर शवविच्छेदन का नाही केले, आभा आणि मनू यांची प्रत्यक्षदर्शी म्हणून न्यायालयात फेरतपासणी का नाही झाली, गोडसेच्या बंदुकीतील किती चेंबर रिकामे होते, अशा अनेक प्रश्नांमुळे गांधी हत्येचा तपास पुन्हा एकदा व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये गांधी हत्येच्या चौकशी संदर्भातील याचिका फेटाळून लावण्यात आली होती. ऑक्टोबर 2017 मध्ये आयटी क्षेत्रातील डॉ. पंकज कुसुमचंद्र यांनी याचिका दाखल केली होती. गांधी हत्येत गोडसेने चौथी गोळी मारली होती, यावर काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. पंकज यांनी याचिकेतून केली होती. आता पुन्हा न्यायालयाच्या आदेशावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.