शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

इंटरनेट शटडाऊन, भारत पुन्हा ‘टाॅप’; ५८.३ कोटी डॉलर्सचा देशाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 06:53 IST

गेल्या वर्षभरात भारतात १०६ वेळेस शटडाउन झाले आणि त्यापैकी ८५ वेळेस तर फक्त जम्मू-काश्मीरमध्येच इंटरनेट बंद करण्यात आले

नवी दिल्ली : सर्वात जास्त वेळेस इंटरनेट ब्लॉक किंवा बंद करणाऱ्या देशांच्या यादीत भारत सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात भारतामध्ये तब्बल १०६ वेळेस इंटरनेट शटडाऊन करण्यात आले आहे. 

सर्वांत जास्त वेळेस इंटरनेट शटडाउन केलेले देश

भारत - १०६, म्यानमार - १५, इराण - ०५, सुदान - ०५, क्युबा - ०४, जॉर्डन - ०४, इथिओपिया - ०३, युगांडा - ०३

कोणत्या राज्यात सर्वाधिक घटनागेल्या वर्षभरात भारतात १०६ वेळेस शटडाउन झाले आणि त्यापैकी ८५ वेळेस तर फक्त जम्मू-काश्मीरमध्येच इंटरनेट बंद करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये अधिकारी इंटरनेट व्यत्यय लादणे सुरू ठेवतात जो दीर्घकाळ कायम असतो, असे 'ॲक्सेस नाऊ'ने जारी केलेल्या अहवालात  नमूद केले आहे.  

२०२१ मधील आकडेवारी

१८२ वेळा जगातील ३४ देशांमध्ये इंटरनेट बंदी घालण्यात आली होती.

५८.३ कोटी डॉलर्सचा भारताला फटका या वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या 'टॉप१०व्हीपीएन' या रिसर्च ग्रुपच्या अहवालानुसार, भारतातील केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांच्या आदेशावरून झालेले इंटरनेट शटडाउन एकूण १,१५७ तास चालले होते. परिणामी २०२१ मध्ये ५८.३ कोटी डॉलर्सचा फटका बसला. तर, या इंटरनेट बंदीचा ५९ कोटी नागरिकांवर परिणाम झाला.

टॅग्स :Internetइंटरनेट