शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : मी दोषींना फाशी द्यायला तयार; महिला नेमबाजने लिहिले रक्ताने पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 13:04 IST

'महिलेच्या हातून फाशी दिल्यामुळे संपूर्ण देशात एक वेगळा संदेश जाईल'

लखनऊ : निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी द्यावी आणि बलात्कार प्रकरणातील दोषींना सहा महिन्यांच्या आत फाशी देण्याच्या मागणीसाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी उपोषण सुरु केले. मात्र, त्यांची रविवारी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातच, आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह हिने गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. यामध्ये निर्भया प्रकरणातील दोषींना फासावर लटकवण्यासाठी आपण तयार असल्याचे म्हटले आहे.

"निर्भया प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या चारही आरोपींना कोणत्याही महिलेकडून फाशी द्यावी, यासाठी मी तयार आहे. महिलेच्या हातून फाशी दिल्यामुळे संपूर्ण देशात एक वेगळा संदेश जाईल. एक महिला फाशीही देऊ शकते, ही बाब त्यातून अधोरेखित होईल,"असे वर्तिका सिंह हिने आपल्या पत्रात म्हटले आहे. याशिवाय, माझ्या मागणीला महिला कलाकार आणि महिला खासदारांनी पाठिंबा द्यावा. त्यामुळे समाजात सकारात्मक बदल  घडेल, असी मला आशा आहे, असेही वर्तिका सिंह हिने पत्रात म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये २७ वर्षीय डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिला जाळून ठार मारण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यावेळी महाराष्ट्राची सून आणि दिग्गज नेमबाज हीना सिधू -पंडित हिने सुद्धा गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एक मागणी केली होती. देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र परवाना द्यावा आणि शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी. शस्त्र परवाना देणे ही समस्या बनणार नाही. आम्हाला देशात प्रवास करताना, कामावर जाताना सुरक्षित वाटायला हवे. आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे, कारण पोलीस योग्य वेळी पोहचू शतक नाहीत. त्यामुळे जेव्हा एखाद्या मुलीवर सामूहिक अत्याचार होणार असेल, तेव्हा पिस्तुलच तिला वाचवू शकते, असे हीना सिधू -पंडित हिने म्हटले होते.

दरम्यान, निर्भया प्रकरणातील आरोपींना येत्या 16 डिसेंबरला, सोमवारी फासावर लटकवा, अशी मागणी त्या दुर्दैवी बलात्कार पीडितेच्या आईने शुक्रवारी केली. 16 डिसेंबर 2012च्या रात्री निर्भयावर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना काही दिवसांनी ती मरण पावली. निर्भया बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यातील एका आरोपीने आपल्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्याच्या मागणीला निर्भयाच्या आईने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत व आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत मी लढा सुरूच ठेवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपAmit Shahअमित शहाRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी