शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

Budget 2019: मोदी सरकार ग्रामीण भागासाठी 16 टक्के खर्चाची करणार तरतूद ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 09:05 IST

ग्रामीण भागातील विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात जवळपास 16 टक्के खर्चाची तरतूद केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अतंरिम अर्थसंकल्प आज संसदेत मांडण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात जवळपास 16 टक्के खर्चाची तरतूद केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  गेल्या वर्षी 1.12 लाख कोटी रुपये ग्रामीण भागासाठी देण्यात आले होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अतंरिम अर्थसंकल्प आज संसदेत मांडण्यात येणार आहे. पीयूष गोयल हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील विकासासाठी अर्थसंकल्पात जवळपास 16 टक्के खर्चाची तरतूद केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, असे समजते की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास योजनेच्या माध्यामातून ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. सुत्रांनुसार, अंतरिम अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी मोदी सरकार 1.3 लाख कोटी रुपये देण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 1.12 लाख कोटी रुपये ग्रामीण भागासाठी देण्यात आले होते.

गेल्या वर्षात शेतमालाचे दर कमी झाले होते. तसेच, वाढत्या महागाईमुळे कृषी उप्तन्नापासून मिळणाऱ्या करात सरकारचे नुकसान झाले होते. त्यामुळेच गेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्कराला लागला होता, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले होते. याचबरोबर, गेल्या सोमवारी काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास गरिबांना किमान उत्पन्न हमी देण्याची घोषणा केली होती. यावरुन किमान उत्पन्न हमी योजनेवरुन भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती.

Budget 2019 Latest News & Live Updates

दरम्यान, ग्रामीण विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांमध्ये सर्वाधिक जास्त निधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी दिला जातो. त्यातून वर्षामध्ये 100 दिवस अथवा जास्त दिवस काम करणाऱ्यांसाठी सरकार पैशांचे वाटप करते. याशिवाय इतर ग्रामीण कल्याणकारी योजनांमार्फत गरीब लोकांसाठी अर्थिक मदतीसाठी 30,000 कोटींचा अर्थसंकल्प असणार आहे, यामध्ये विधवा आणि अपगांचा सुद्धा समावेश आहे. 

 

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019agricultureशेतीRural Developmentग्रामीण विकासFarmerशेतकरीpiyush goyalपीयुष गोयल