शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: मोदी सरकार ग्रामीण भागासाठी 16 टक्के खर्चाची करणार तरतूद ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 09:05 IST

ग्रामीण भागातील विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात जवळपास 16 टक्के खर्चाची तरतूद केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अतंरिम अर्थसंकल्प आज संसदेत मांडण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात जवळपास 16 टक्के खर्चाची तरतूद केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  गेल्या वर्षी 1.12 लाख कोटी रुपये ग्रामीण भागासाठी देण्यात आले होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अतंरिम अर्थसंकल्प आज संसदेत मांडण्यात येणार आहे. पीयूष गोयल हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील विकासासाठी अर्थसंकल्पात जवळपास 16 टक्के खर्चाची तरतूद केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, असे समजते की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास योजनेच्या माध्यामातून ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. सुत्रांनुसार, अंतरिम अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी मोदी सरकार 1.3 लाख कोटी रुपये देण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 1.12 लाख कोटी रुपये ग्रामीण भागासाठी देण्यात आले होते.

गेल्या वर्षात शेतमालाचे दर कमी झाले होते. तसेच, वाढत्या महागाईमुळे कृषी उप्तन्नापासून मिळणाऱ्या करात सरकारचे नुकसान झाले होते. त्यामुळेच गेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्कराला लागला होता, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले होते. याचबरोबर, गेल्या सोमवारी काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास गरिबांना किमान उत्पन्न हमी देण्याची घोषणा केली होती. यावरुन किमान उत्पन्न हमी योजनेवरुन भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती.

Budget 2019 Latest News & Live Updates

दरम्यान, ग्रामीण विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांमध्ये सर्वाधिक जास्त निधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी दिला जातो. त्यातून वर्षामध्ये 100 दिवस अथवा जास्त दिवस काम करणाऱ्यांसाठी सरकार पैशांचे वाटप करते. याशिवाय इतर ग्रामीण कल्याणकारी योजनांमार्फत गरीब लोकांसाठी अर्थिक मदतीसाठी 30,000 कोटींचा अर्थसंकल्प असणार आहे, यामध्ये विधवा आणि अपगांचा सुद्धा समावेश आहे. 

 

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019agricultureशेतीRural Developmentग्रामीण विकासFarmerशेतकरीpiyush goyalपीयुष गोयल