शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 06:26 IST

Supreme Court News: जेव्हा विवाह परस्पर संमतीने आणि दोन्ही कुटुंबांच्या मान्यतेने झाला आहे, तेव्हा राज्याने जामिनाला विरोध करणे योग्य नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत अटक केलेल्या एका तरुणाला जामीन मंजूर केला आहे.

नवी दिल्ली - जेव्हा विवाह परस्पर संमतीने आणि दोन्ही कुटुंबांच्या मान्यतेने झाला आहे, तेव्हा राज्याने जामिनाला विरोध करणे योग्य नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत अटक केलेल्या एका तरुणाला जामीन मंजूर केला आहे.

उत्तराखंड पोलिसांनी आंतरधर्मीय विवाहानंतर राज्याच्या धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत त्याला अटक केली होती. हा तरुण सहा महिन्यांहून अधिक काळ कोठडीत होता. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एस. सी. शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, जेव्हा विवाह परस्पर संमतीने आणि दोन्ही कुटुंबांच्या मान्यतेने झाला आहे, तेव्हा राज्याने जामिनाला विरोध करणे योग्य नाही.

याचिकाकर्ता अमन सिद्दीकीच्या आंतरधर्मीय विवाहानंतर लगेचच काही व्यक्ती आणि संघटनांनी अमनने बेकायदा धर्मांतर केल्याचा आरोप केला होता. यानंतर, उत्तराखंड धर्म स्वातंत्र्य कायदा, २०१८ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.

कलम ३ मध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्यास मनाई आहे, तर कलम ५ मध्ये एक ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. कलम ३१८(४) आणि ३१९ मध्ये फसवणूक आणि तोतयागिरीसाठी अनुक्रमे सात आणि पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.उत्तराखंड उच्च न्यायालयाने त्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, अमनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयmarriageलग्नUttarakhandउत्तराखंड