शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचाच हात; पुरावे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 10:09 IST

पाकिस्तानमधून दहशतवाद्यांकडून मिळालेले मेसेज सुरक्षा दलांकडून इंटरसेप्ट

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांना मिळाले आहेत. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या सूचनेवरुन दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील तीन विशेष पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यामुळेच भारतानं संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांची भेट घेणार होत्या. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर भारतानं ही भेट रद्द केली. पाकिस्तानकडून येणारे मेसेज भारतीय सुरक्षा दलांनी इंटरसेप्ट केल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. मेसेज इंटरसेप्ट करण्यात आल्यानंतरच सरकारकडून न्यूयॉर्कमधील भेट रद्द करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी चौघांचं अपहरण केलं होतं. यामध्ये तीन पोलिसांचा समावेश होता. या तिन्ही पोलिसांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांची हत्या करण्याचे आदेश सीमेपलीकडून देण्यात आले होते, असा दावा भारतीय सुरक्षा दलांनी केला आहे. हे मेसेज भारतीय सुरक्षा यंत्रणांनी इंटरसेप्ट केले आहेत. पाकिस्तानकडून येणारे मेसेज इतके स्पष्ट होते, की त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख होता. सीमेपलीकडून आलेल्या मेसेजमधून तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय एका नागरिकाची सुटका करण्याचे आदेशदेखील दहशतवाद्यांना सीमेपलीकडून देण्यात आले. या संदेशांचा वेग अतिशय वेग अतिशय जास्त होता आणि यानंतर लगेचच दहशतवाद्यांकडून मेसेजमधून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे दहशतवाद्यांचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दलांना पुरेसा वेळ मिळाला नाही. दहशतवाद्यांना हत्या केलेले एसपीओ निसार अहमद, फिरदोस अहमद आणि कुलवंत सिंह यांचे मृतदेह एका बागेत मिळाले. तर एका एसपीओचा भाऊ असलेल्या फयाज अहमद भटला दहशतवाद्यांनी सोडून दिलं.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान