शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

हवाईदलाच्या तळांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट; श्रीनगरमध्ये हायअलर्ट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 10:04 IST

हवाई दलाच्या श्रीनगर आणि अवंतीपुरा बेसकॅप्म दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहेत. 

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील काही भागामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीनगरमध्ये दहशतवाद पसरविण्यासाठी दहशतवाद्यांकडून षडयंत्र रचलं जात असल्याची माहिती हाती लागली आहे. सरकारी सूत्रांनुसार काश्मीरमधील श्रीनगर आणि अवंतीपुरा या एअरबेसवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता दिली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात हायअलर्ट जारी केलेला आहे. 

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र रचत आहे. हवाई दलाच्या श्रीनगर आणि अवंतीपुरा बेसकॅप्म दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहेत. 

अनेक दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमकी होत आहेत. त्यामुळे फक्त सीमेच्या पलीकडे नाही तर घाटीमध्येही काही दहशतवादी लपून बसल्याचं सांगितलं जात आहे. गुरुवारी पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये भीषण चकमक झाली. त्यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले मात्र या चकमकीत एक जवान शहीददेखील झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद संपविण्यासाठी भारतीय जवानांकडून ऑपरेशन ऑलआउट सुरु करण्यात आलं आहे. या ऑपरेशनमुळे या वर्षीच्या सुरुवातीपासून अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. 

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

बुरहान वानीचा चकमकीत खात्मा सुरक्षा रक्षकांनी 8 जुलै 2016 मध्ये चकमकीत बुरहान वानी याचा खात्मा केला होता. बुरहानचा खात्मा केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण होते. तेव्हापासून आतापर्यंतच्या हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. हिज्बुल या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वॉन्टेड असलेला बुरहान वानी हा येथील युवकांसाठी सोशल मीडियावर फेमस होता. काही महिन्यांपूर्वी स्थानिक लोकांना विचारले असता त्याला 'भारतीय एजेंट' असल्याचे सांगत. मात्र, सुरक्षा यंत्राणांसाठी बुरहान वाणी हा मीडियाने तयार केलेला कागदी वाघ होता. पुलवामामधील त्राल परिसरात जन्म झालेला बुरहान वानी वयाच्या 15 व्या वर्षी दहशतवादी बनला होता. 22 व्या वर्षी सुरक्षा रक्षकांनी त्याचा खात्मा केला. बुरहान वानीच्या खात्माआधी काश्मीर खोऱ्यात जैश-ए-मोहम्मद या  दहशतवादी संघटनेचा नायनाट होण्यास आला होता. मात्र, गेल्या तीन वर्षात पुन्हा जैश-ए-मोहम्मदने डोके वर काढले आहे. काश्मीर खोऱ्यात शेकडो बुरहान वानी तयार करण्याचा उद्देश जैश-ए-मोहम्मद संघटनेचा आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानairforceहवाईदल