शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरपेक्षा स्वत:च्या राज्यात काय चाललंत ते पाहा, मंत्र्याचा गहलोत सरकारवर निशाणा, सहा तासांत हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 10:48 IST

Rajendra Gudha: आपण मणिपूर ऐवजी आपल्या राज्यात काय चाललं आहे, हे पाहिलं पाहिजे. आपण महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरलो आहोत, असं विधान अशोक गहलोत सरकारमध्ये मंत्री असलेल्या गुढा यांनी राजस्थान विधानसभेत केलं.

मणिपूरमध्ये दोन जमातींमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची काढण्यात आलेली धिंड याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र राजस्थान सरकारमधील मंत्री राजेंद्र गुढा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कोंडी केली आहे. आपण मणिपूर ऐवजी आपल्या राज्यात काय चाललं आहे, हे पाहिलं पाहिजे. आपण महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरलो आहोत, असं विधान गुढा यांनी राजस्थान विधानसभेत केलं. या वक्तव्याचं विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं स्वागत केलं. मात्र या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर अशोक गहलोत यांनी अवघ्या सहा तासांमध्ये राजेंद्र गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.

आता महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजेंद्र गुढा चर्चेत आले आहेत. मात्र गुढा यांनी  आपल्या विधानांमधून सरकार आणि पक्षाला अडचणीत आणण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. गहलोत सरकारमध्ये राजेंद्र गुढा हे सैनिक कल्याण (स्वतंत्र प्रभार) आणि होमगार्ड, नागरिक सुरक्षा, पंचायती राज व ग्रमविकास राज्यमंत्रिपद सांभाळत होते. 

राजेंद्र गुढा हे झुंझुनू जिल्ह्यातील उदयपूरवाटी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. ते २००८ मध्ये बसपाकडून निव़ून आले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या आमदारांसह गहलोत सरकारला पाठिंबा दिला होता. तेव्हा अशोक गहलोत यांनी त्यांना राज्यमंत्रिपद दिले होते. दरम्यान, २०१८ मध्ये ते पुन्हा निवडून आले. यावेळीही त्यांनी अशोक गहलोत सरकारला पाठिंबा दिला होता.  वर्षभरानंतर गुढा यांच्यासह बसपाचे सहा आमदार काँग्रेसमध्ये विलीन झाले होते. त्यानंतर गुढा यांना पुन्हा मंत्री बनवण्यात आलं. 

दरम्यान, स्वत:च्याच सरकारवर केलेल्या टीकेमुळे गुढा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसने ही अनुशासनात्मक कारवाई असल्याचा दावा केला आहे. तर भाजपा आणि विरोधी पक्षांनी राजेंद्र गुढा यांना खरं बोलण्याची शिक्षा दिली गेल्याचा आरोप केला आहे.  गुढा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय हा हायकमांड आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या पातळीवर झाला आहे, त्यांनी विचापूर्वकच हा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेस आमदार अमीर कागजी यांनी सांगितले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोतManipur Violenceमणिपूर हिंसाचार