शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

मणिपूरपेक्षा स्वत:च्या राज्यात काय चाललंत ते पाहा, मंत्र्याचा गहलोत सरकारवर निशाणा, सहा तासांत हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 10:48 IST

Rajendra Gudha: आपण मणिपूर ऐवजी आपल्या राज्यात काय चाललं आहे, हे पाहिलं पाहिजे. आपण महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरलो आहोत, असं विधान अशोक गहलोत सरकारमध्ये मंत्री असलेल्या गुढा यांनी राजस्थान विधानसभेत केलं.

मणिपूरमध्ये दोन जमातींमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची काढण्यात आलेली धिंड याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र राजस्थान सरकारमधील मंत्री राजेंद्र गुढा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कोंडी केली आहे. आपण मणिपूर ऐवजी आपल्या राज्यात काय चाललं आहे, हे पाहिलं पाहिजे. आपण महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरलो आहोत, असं विधान गुढा यांनी राजस्थान विधानसभेत केलं. या वक्तव्याचं विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं स्वागत केलं. मात्र या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर अशोक गहलोत यांनी अवघ्या सहा तासांमध्ये राजेंद्र गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.

आता महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजेंद्र गुढा चर्चेत आले आहेत. मात्र गुढा यांनी  आपल्या विधानांमधून सरकार आणि पक्षाला अडचणीत आणण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. गहलोत सरकारमध्ये राजेंद्र गुढा हे सैनिक कल्याण (स्वतंत्र प्रभार) आणि होमगार्ड, नागरिक सुरक्षा, पंचायती राज व ग्रमविकास राज्यमंत्रिपद सांभाळत होते. 

राजेंद्र गुढा हे झुंझुनू जिल्ह्यातील उदयपूरवाटी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. ते २००८ मध्ये बसपाकडून निव़ून आले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या आमदारांसह गहलोत सरकारला पाठिंबा दिला होता. तेव्हा अशोक गहलोत यांनी त्यांना राज्यमंत्रिपद दिले होते. दरम्यान, २०१८ मध्ये ते पुन्हा निवडून आले. यावेळीही त्यांनी अशोक गहलोत सरकारला पाठिंबा दिला होता.  वर्षभरानंतर गुढा यांच्यासह बसपाचे सहा आमदार काँग्रेसमध्ये विलीन झाले होते. त्यानंतर गुढा यांना पुन्हा मंत्री बनवण्यात आलं. 

दरम्यान, स्वत:च्याच सरकारवर केलेल्या टीकेमुळे गुढा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसने ही अनुशासनात्मक कारवाई असल्याचा दावा केला आहे. तर भाजपा आणि विरोधी पक्षांनी राजेंद्र गुढा यांना खरं बोलण्याची शिक्षा दिली गेल्याचा आरोप केला आहे.  गुढा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय हा हायकमांड आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या पातळीवर झाला आहे, त्यांनी विचापूर्वकच हा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेस आमदार अमीर कागजी यांनी सांगितले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोतManipur Violenceमणिपूर हिंसाचार