शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 12:24 IST

IAS दिव्या मित्तल यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. ज्यांनी सर्वप्रथम JEE, नंतर CAT आणि शेवटी UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 

यूपीएससी, कॅट आणि जेईई या परीक्षा सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जातात. यापैकी एक परीक्षा उत्तीर्ण होणं देखील अनेकांसाठी अवघड असतं. आज आपण एका महिला IAS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी तिन्ही कठीण परीक्षा एकत्र उत्तीर्ण केल्या आहेत. IAS दिव्या मित्तल यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. ज्यांनी सर्वप्रथम JEE, नंतर CAT आणि शेवटी UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 

दिव्या मित्तल या हरियाणातील रेवाडी येथील रहिवासी आहेत. कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सीएसई परीक्षा उत्तीर्ण केली. पण यावेळी त्यांना आयपीएस सेवा मिळाली, पण मित्तल यांना आयएएस सेवा हवी होती. अशा परिस्थितीत त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि ऑल इंडिया ६८ रँकसह आयएएस झाल्या.

दिव्या मित्तल यांनी सुरुवातीपासूनच आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. आयआयटी दिल्लीतून बीटेक पदवी घेऊन त्यांचा प्रवास सुरू झाला. आयआयटी दिल्लीनंतर त्यांनी कॅट परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयआयएम बंगलोरमधून एमबीए पदवी मिळवली. यानंतर एका चांगल्या जॉब पॅकेजसाठी लंडनला गेल्या. 

दिव्या मित्तल यांच्या देशभक्तीने त्यांना भारतात परत आणलं आणि येथे आल्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. मित्तल यांच्या आयएएस होण्यात त्यांचे पती आयएएस गगनदीप सिंह यांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी दिव्या मित्तल यांना नागरी सेवांमध्ये करिअर करण्याची प्रेरणा दिली.

अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या दिव्या मित्तल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणांनी मोबाईल फोनपासून दूर राहणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळात फोन हा तरुणांना सर्वात जास्त विचलित करणारा आहे. नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

मित्तल यांना मसुरी येथील LBSNAA येथे उत्कृष्ट कामगिरीसाठी अशोक बंबावाले पुरस्कार प्रदान करण्यात आला, जेथे नागरी सेवा अधिकाऱ्याचं ट्रेनिंग होतं. दिव्या मित्तल अभ्यास आणि कामाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर होत्या. मिर्झापूर येथे पोस्टिंग असताना त्यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर जिल्ह्यातील हलिया ब्लॉकमधील लहुरियादह गावाला पाणीपुरवठा करण्याचा चमत्कार केला होता. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी