शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 12:24 IST

IAS दिव्या मित्तल यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. ज्यांनी सर्वप्रथम JEE, नंतर CAT आणि शेवटी UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 

यूपीएससी, कॅट आणि जेईई या परीक्षा सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जातात. यापैकी एक परीक्षा उत्तीर्ण होणं देखील अनेकांसाठी अवघड असतं. आज आपण एका महिला IAS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी तिन्ही कठीण परीक्षा एकत्र उत्तीर्ण केल्या आहेत. IAS दिव्या मित्तल यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. ज्यांनी सर्वप्रथम JEE, नंतर CAT आणि शेवटी UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 

दिव्या मित्तल या हरियाणातील रेवाडी येथील रहिवासी आहेत. कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सीएसई परीक्षा उत्तीर्ण केली. पण यावेळी त्यांना आयपीएस सेवा मिळाली, पण मित्तल यांना आयएएस सेवा हवी होती. अशा परिस्थितीत त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि ऑल इंडिया ६८ रँकसह आयएएस झाल्या.

दिव्या मित्तल यांनी सुरुवातीपासूनच आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. आयआयटी दिल्लीतून बीटेक पदवी घेऊन त्यांचा प्रवास सुरू झाला. आयआयटी दिल्लीनंतर त्यांनी कॅट परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयआयएम बंगलोरमधून एमबीए पदवी मिळवली. यानंतर एका चांगल्या जॉब पॅकेजसाठी लंडनला गेल्या. 

दिव्या मित्तल यांच्या देशभक्तीने त्यांना भारतात परत आणलं आणि येथे आल्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. मित्तल यांच्या आयएएस होण्यात त्यांचे पती आयएएस गगनदीप सिंह यांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी दिव्या मित्तल यांना नागरी सेवांमध्ये करिअर करण्याची प्रेरणा दिली.

अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या दिव्या मित्तल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणांनी मोबाईल फोनपासून दूर राहणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळात फोन हा तरुणांना सर्वात जास्त विचलित करणारा आहे. नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

मित्तल यांना मसुरी येथील LBSNAA येथे उत्कृष्ट कामगिरीसाठी अशोक बंबावाले पुरस्कार प्रदान करण्यात आला, जेथे नागरी सेवा अधिकाऱ्याचं ट्रेनिंग होतं. दिव्या मित्तल अभ्यास आणि कामाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर होत्या. मिर्झापूर येथे पोस्टिंग असताना त्यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर जिल्ह्यातील हलिया ब्लॉकमधील लहुरियादह गावाला पाणीपुरवठा करण्याचा चमत्कार केला होता. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी