शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

देशरक्षणासाठी 'फुल प्रूफ' रणनीती आखणारा चाणक्य; अजित डोवाल यांचा प्रवास करेल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 12:20 IST

देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारा योद्धा, अशीच डोवाल यांची ओळख आहे. त्यांची ही झंझावाती कारकीर्द लक्षात घेऊनच, स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रूपच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे.

भारतीय लष्कराने दोन वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेला सर्जिकल स्ट्राइक असो किंवा डोकलाम प्रकरणात चीनला जशास तसं उत्तर देण्याचं ठाम धोरण; ही रणनीती आखण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वाची होती. देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारा योद्धा, अशीच डोवाल यांची ओळख आहे. त्यांची ही झंझावाती कारकीर्द लक्षात घेऊनच, स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रूपच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे अजित डोवाल हे देशातले सर्वशक्तिमान नोकरशहा बनणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या कामगिरीवर एक दृष्टिक्षेप. पाकिस्तानात सात वर्षं भारताचे हेर म्हणून राहिलेल्या डोवाल यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

>> उत्तराखंडच्या पौडी गढवालमध्ये २० जानेवारी १९४५ रोजी अजित डोवाल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भारतीय लष्करात होते. त्यामुळे देशप्रेम आणि धाडस त्यांच्या रक्तातच होतं. 

>> अजमेर मिलिट्री स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. 

>> १९६८ मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली आणि चार वर्षांनी - १९७२ मध्ये ते गुप्तचर यंत्रणेत रुजू झाले. 

>> कारकिर्दीतील बराच काळ ते इंटेलिजन्स ब्यूरोमध्येच (IB) होते. या दरम्यान, पाकिस्तानमध्ये सात वर्षं ते भारताचे हेर होते. हे अत्यंत जोखमीचं काम करण्यासाठी त्यांनी धर्मही बदलला होता, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

>> १९८८ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या 'ऑपरेशन ब्लॅक थंडर'चं नेतृत्व अजित डोवाल यांनी केलं होतं.   

>> पंजाब पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्डना सोबत घेऊन त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. 

>> काश्मीर खोऱ्यात काम करताना त्यांनी अनेक दहशतवाद्यांना शरण यायला भाग पाडलं होतं. तब्बल ३३ वर्षं ते ईशान्य भाारत, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये हेर होते.

>> आपल्या धाडसी कामगिरीच्या जोरावर अजित डोवाल यांच्याकडे IBचं संचालकपद सोपवण्यात आलं होतं. या पदावरून ते २००५ मध्ये निवृत्त झाले.

>> ३० मे २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पाचवे सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांच्याकडे जबाबदारी सोपवली.

>> अलीकडच्या काळात, पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राइक आणि डोकलाम वादात त्यांनी आखलेल्या रणनीतीचंही कौतुक झालं होतं. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक