शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

जाणून घ्या मोदींच्या दाव्यातील तथ्य; INS विराटचा वापर राजीव गांधींनी कधी आणि केव्हा केला होता?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 10:24 IST

राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का?

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापू लागलंय. रामलीला मैदानावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला. यामध्ये बोलताना मोदी यांनी राजीव गांधी यांना पुन्हा लक्ष्य केले. जे लोक आज सांगत आहेत की, सेना कोणाची जहागीर नाही त्याच कुटुंबीयांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. 

आयएनएस विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सुट्ट्यांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली त्याबाबत एका हिंदी न्यूज चॅनेलने एक बातमी प्रसारीत केली आहे. ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्टी घालविण्यासाठी केला होता. त्यावेळीही राजीव गांधी यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. 

राजीव गांधींनी नौदलाचे जहाज कुटुंबाला फिरण्यासाठी वापरले होते

कधी साजरी केली सुट्टी?इंडिया टूडे या चॅनेलच्या बातमीनुसार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी 1987 मध्ये नवीन वर्ष साजरं करण्यासाठी गांधी कुटुंब आणि काही खास मित्रांसोबत एका बेटावर सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी 10 दिवस ते राहिले होते. 

सुट्टी साजरी करण्यासाठी कोणत्या ठिकाणी गेले होते?लक्षद्वीप येथील सुंदर असं बंगाराम बेटावर राजीव गांधी, त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार सुट्टी एन्जॉय करायला गेले होते. बंगाराम बेट हे अतिशय सुंदर आणि अप्रतिम बेट आहे. 

गांधी परिवारासोबत कोण कोण होतं?राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत या पर्यटनात राहुल आणि प्रियंका गांधी यांचे मित्र, सोनिया गांधी यांची बहीण तसेच कुटुंब, सोनिया गांधी यांची आई, भाऊ आणि मामा सहभागी होते. तसेच राजीव गांधी यांचे मित्र अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया बच्चन आणि तीन मुलंहीसोबत होती. तीन मुलांमध्ये अमिताभ यांचे भाऊ अजिताभ यांच्या मुलीचाही समावेश होता. 

गोपनीय दौरा मिडीयात उघड झालागांधी कुटुंबीयांचा हा दौरा प्रचंड गोपनीय ठेवण्यात आला होता. मात्र तरीही ही बातमी माध्यमांसमोर आली. त्यानंतर अनेक विवाद झाले. राजीव गांधी यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीAmitabh Bachchanअमिताभ बच्चनRahul Gandhiराहुल गांधी