भारतीय नौदलासाठी आजचा ३ एप्रिल २०२६ हा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज एकाच वेळी दोन मोठ्या संरक्षण प्रकल्पांची माहिती देऊन जगाला भारताच्या वाढत्या सागरी शक्तीची जाणीव करून दिली आहे. प्रोजेक्ट १७ए अंतर्गत तयार करण्यात आलेले अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट 'आयएनएस तारागिरी' आज अधिकृतपणे नौदलात सामील होत आहे. तर भारताची तिसरी स्वदेशी अण्वस्त्रवाहू पाणबुडी 'अरिदमन'लवकरच नौदलाच्या ताफ्यात येणार आहे.
आयएनएस अरिदमन'आयएनएस अरिहंत'नंतर 'आयएनएस अरिदमन' ही भारताची दुसरी अरिहंत श्रेणीतील अण्वस्त्रवाहू पाणबुडी आहे. ही पाणबुडी दीर्घकाळ पाण्याखाली राहण्यास सक्षम असून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते. यात ७५० किमी पल्ल्याची K-15 किंवा ३,५०० किमी पल्ल्याची K-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी अरिदमनची भूमिका अत्यंत कळीची ठरेल. अरिहंत आणि अरिघाट यांच्यानंतर 'अरिदमन'च्या आगमनाने भारताचा 'न्यूक्लियर ट्रायड' (जमीन, आकाश आणि समुद्रातून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता) अधिक मजबूत झाला आहे.
आयएनएस तारागिरी: अदृश्य शिकारीप्रोजेक्ट १७ए अंतर्गत तयार करण्यात आलेले 'आयएनएस तारागिरी' हे एक स्टेल्थ फ्रिगेट आहे. याचे डिझाइन अशा प्रकारे केले आहे की ते शत्रूच्या रडारवर सहजासहजी दिसत नाही. यात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक टॉर्पेडो प्रणाली बसवण्यात आली आहे. तारागिरी आपल्या वेगाने आणि अचूक मारगिरीने समुद्रात भारताचे वर्चस्व सिद्ध करेल.
डिफेन्स एक्स्पो २०२६ मध्ये होणार शक्तीप्रदर्शनसूत्रांच्या माहितीनुसार, या युद्धनौका आणि पाणबुडीचे कार्यान्वित होणे हे भारताच्या सागरी सुरक्षेसाठी मैलाचा दगड ठरेल. आगामी काळात होणाऱ्या संरक्षण प्रदर्शनांमध्ये या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जगासमोर प्रदर्शन केले जाणार आहे.
राजनाथ सिंह यांचा विश्वास"आजचा दिवस आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय आहे. 'तारागिरी' आणि 'अरिदमन' या दोन्ही युद्धनौका भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी कवच म्हणून काम करतील," असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : India's naval power surges with 'INS Taragiri' stealth frigate and 'Aridaman' nuclear submarine joining fleet. This strengthens India's maritime security and nuclear triad, alarming China and Pakistan amid growing regional tensions.
Web Summary : भारत की नौसेना शक्ति में 'आईएनएस तारागिरी' स्टेल्थ फ्रिगेट और 'अरिदमन' परमाणु पनडुब्बी के शामिल होने से उछाल आया है। इससे भारत की समुद्री सुरक्षा और परमाणु त्रिकोण मजबूत हुआ है, जिससे क्षेत्रीय तनाव के बीच चीन और पाकिस्तान में खलबली मच गई है।