शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राखीव जागा न ठेवता जाहिरात देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी, व्यंकय्या नायडूंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 05:12 IST

५० टक्के राखीव जागा न ठेवता चार विद्यापीठांनी प्राध्यापकांच्या भरतीसाठी जाहिराती दिल्याच्या प्रकरणाची केंद्र सरकारने चौकशी करावी

नवी दिल्ली : ५० टक्के राखीव जागा न ठेवता चार विद्यापीठांनी प्राध्यापकांच्या भरतीसाठी जाहिराती दिल्याच्या प्रकरणाची केंद्र सरकारने चौकशी करावी असा आदेश उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे.उच्च शिक्षण देणाºया सार्वजनिक शिक्षणसंस्थांतील प्राध्यापकांच्या भरतीमध्ये राखीव जागांची जुनीच पद्धत कायम ठेवण्याचा वटहुकूम केंद्र सरकारने ७ मार्च रोजी जारी केला होता.असे असूनही पंजाबमधील केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटक विद्यापीठ, तामिळनाडू विद्यापीठ, मध्य प्रदेशच्या अमरकंटक येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ या चार विद्यापीठांनी सहप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक पदांसाठी जाहिराती देताना नियम मोडला. त्यांनी ५० टक्के राखीव जागा न ठेवताच या पदांच्या भरतीसाठी जाहिराती दिल्या.समाजवादी पक्षाचे जावेद अली खान यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. पंजाबमधील केंद्रीय विद्यापीठाने प्राध्यापकांच्या १५६ पदांसाठी जाहिरात दिली. अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्गीयांसाठी ७५ ऐवजी फक्त ५० पदेच राखीव ठेवण्यात आली होती. तामिळनाडू विद्यापीठाने ११३ पदांमध्ये फक्त ४० तर मध्य प्रदेशातील अमरकंटक येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठाने ८५ पदांमध्ये ३५ पदे राखीव ठेवली होती. कर्नाटक विद्यापीठाने प्राध्यापकांच्या १३७ पदांमध्ये ५० टक्क्यांहून कमी राखीव जागा ठेवल्या होत्या.लोहारही राहिले उपेक्षितजागा ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावी, असा आदेश उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे.ोहार जातीचा उल्लेख करताना त्यातील स्पेलिंगमध्ये चुका झाल्याने त्यांना राखीव जागांचा फायदा मिळत नाही, अशी व्यथा जद (यू)च्या खासदार कहकशाँ परवीन यांनी मांडली.केंद्र सरकारच्या धोरणानुसार शिक्षणसंस्थांमध्ये अनुसूचित जातींना १५ टक्के, अनुसूचित जमातींना ७.५ टक्के, अन्य मागासवर्गीयांना २७ टक्के राखीव जागा ठेवणे बंधनकारक आहे.एखादी शिक्षणसंस्था एकच युनिट मानून तेथील प्राध्यापकांच्या रिकाम्या पदांच्या भरतीसाठी राखीव जागांचा नियम २००५ सालापासून लागू करण्यात आला.मात्र एखाद्या शिक्षणसंस्थेतील भरतीच्या एकूण पदांपेक्षा तेथील विभागात जेवढी रिकामी पदे आहेत त्या प्रमाणात राखीव जागा द्याव्यात, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. त्याचे पालन विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्च २०१८ पासून सुरू केले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाEducation Sectorशिक्षण क्षेत्र