शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

राखीव जागा न ठेवता जाहिरात देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी, व्यंकय्या नायडूंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 05:12 IST

५० टक्के राखीव जागा न ठेवता चार विद्यापीठांनी प्राध्यापकांच्या भरतीसाठी जाहिराती दिल्याच्या प्रकरणाची केंद्र सरकारने चौकशी करावी

नवी दिल्ली : ५० टक्के राखीव जागा न ठेवता चार विद्यापीठांनी प्राध्यापकांच्या भरतीसाठी जाहिराती दिल्याच्या प्रकरणाची केंद्र सरकारने चौकशी करावी असा आदेश उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे.उच्च शिक्षण देणाºया सार्वजनिक शिक्षणसंस्थांतील प्राध्यापकांच्या भरतीमध्ये राखीव जागांची जुनीच पद्धत कायम ठेवण्याचा वटहुकूम केंद्र सरकारने ७ मार्च रोजी जारी केला होता.असे असूनही पंजाबमधील केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटक विद्यापीठ, तामिळनाडू विद्यापीठ, मध्य प्रदेशच्या अमरकंटक येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ या चार विद्यापीठांनी सहप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक पदांसाठी जाहिराती देताना नियम मोडला. त्यांनी ५० टक्के राखीव जागा न ठेवताच या पदांच्या भरतीसाठी जाहिराती दिल्या.समाजवादी पक्षाचे जावेद अली खान यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. पंजाबमधील केंद्रीय विद्यापीठाने प्राध्यापकांच्या १५६ पदांसाठी जाहिरात दिली. अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्गीयांसाठी ७५ ऐवजी फक्त ५० पदेच राखीव ठेवण्यात आली होती. तामिळनाडू विद्यापीठाने ११३ पदांमध्ये फक्त ४० तर मध्य प्रदेशातील अमरकंटक येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठाने ८५ पदांमध्ये ३५ पदे राखीव ठेवली होती. कर्नाटक विद्यापीठाने प्राध्यापकांच्या १३७ पदांमध्ये ५० टक्क्यांहून कमी राखीव जागा ठेवल्या होत्या.लोहारही राहिले उपेक्षितजागा ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावी, असा आदेश उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे.ोहार जातीचा उल्लेख करताना त्यातील स्पेलिंगमध्ये चुका झाल्याने त्यांना राखीव जागांचा फायदा मिळत नाही, अशी व्यथा जद (यू)च्या खासदार कहकशाँ परवीन यांनी मांडली.केंद्र सरकारच्या धोरणानुसार शिक्षणसंस्थांमध्ये अनुसूचित जातींना १५ टक्के, अनुसूचित जमातींना ७.५ टक्के, अन्य मागासवर्गीयांना २७ टक्के राखीव जागा ठेवणे बंधनकारक आहे.एखादी शिक्षणसंस्था एकच युनिट मानून तेथील प्राध्यापकांच्या रिकाम्या पदांच्या भरतीसाठी राखीव जागांचा नियम २००५ सालापासून लागू करण्यात आला.मात्र एखाद्या शिक्षणसंस्थेतील भरतीच्या एकूण पदांपेक्षा तेथील विभागात जेवढी रिकामी पदे आहेत त्या प्रमाणात राखीव जागा द्याव्यात, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. त्याचे पालन विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्च २०१८ पासून सुरू केले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाEducation Sectorशिक्षण क्षेत्र