शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 15:08 IST

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी मुलं त्यांच्या आईपासून दुरावली आहेत आणि त्यांना आता एकटच पाकिस्तानात परत जावं लागत आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर पाकिस्तानातून परतण्याचा सल्लाही दिला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती अचानक बदलली आहे. याच दरम्यान भावुक करणारी घटना समोर आली आहे. 

पाकिस्तानी मुलं त्यांच्या आईपासून दुरावली आहेत आणि त्यांना आता एकटच पाकिस्तानात परत जावं लागत आहे. ११ वर्षांची जैनब आणि ८ वर्षांचा जेनिश त्यांच्या आजीला भेटण्यासाठी दिल्लीत आले होते. आता परिस्थिती अशी झाली आहे की, त्यांना त्यांच्या आईपासून वेगळं होऊन पाकिस्तानात परतावं लागत आहे. कारण त्यांच्या आईकडे इंडियन पासपोर्ट आहे. तर मुलं पाकिस्तानचे नागरिक आहेत.

"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना

"मी माझ्या आईशिवाय राहू शकत नाही"

जैनब म्हणाली की, ती तिच्या आईशिवाय परत जात आहे. तिचं मन खूप दुखावलं गेलं आहे. जैनब तिच्या पालकांसह भारतात आली होती आणि आता ती पाकिस्तानला परतत आहे. लहान जैनबला अश्रू अनावर झाले. मी माझ्या आजीला भेटण्यासाठी भारतात आली होती, पण आता मी माझ्या आईशिवाय पाकिस्तानला परतत आहे.मी खूप दुखावले आहे. मी माझ्या आईशिवाय राहू शकत नाही असं तिने म्हटलं आहे. 

Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

"आईकडे इंडियन पासपोर्ट"

आज तकशी बोलताना जैनब म्हणाली, "आता माझी आई परत येऊ शकत नाही. आईकडे इंडियन पासपोर्ट आहे आणि आमच्या सर्वांकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहेत. आईशिवाय राहणं खूप कठीण आहे. मी खूप दुखावले गेले आहे. आम्हाला येथील सरकारकडून परत जाण्याचा आदेश मिळाला आहे. ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारलं आहे त्यांना सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे. इतकी कठोर शिक्षा दिली पाहिजे की, त्यांना ती आयुष्यभर लक्षात राहील आणि ते आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्रास देणार नाहीत." 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान