शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बिहारमधील बसच्या 'त्या' आगीतून संशयाचा धूर, २७ जणांच्या मृत्यूचंही गूढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 14:45 IST

अपघाताबद्दल समोर आलेली नवी माहिती धक्कादायक

पटना: बिहारमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर आलीय. या अपघातात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचं बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यानं सांगितलंय. या बसमधून 13 जण प्रवासी करत होते. मात्र अपघातानंतर कोणत्याही व्यक्तीचा मृतदेह मिळाली नसल्याची माहिती मंत्री दिनेश चंद्र यादव दिली. विशेष म्हणजे या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खुद्द दिनेश चंद्र यादव यांनी काल दिली होती. या दुर्घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतदेखील जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या घटनेनंतर ट्विट करुन शोक व्यक्त केला होता. या अपघाताची माहिती जाहीर करण्याची घाई केल्याबद्दल बिहार सरकारवर टीका होतेय. ही घटना गुरुवारी रात्री घडली. बिहारच्या मोतिहारी जिल्ह्याच्या कोटवामध्ये मुजफ्फरपूरहून दिल्लीला जाणारी बस पुलावरुन कोसळली. यानंतर बसला आग लागली. या बसमध्ये 30 प्रवासी होते. त्यातील 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. बिहार सरकारचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री दिनेश चंद्र यादव यांनीदेखील 27 प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला होता. शुक्रवारी बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली. अपघातग्रस्त बसमध्ये एकही मृतदेह न मिळाल्याची माहिती मुजफ्फरपूर झोनचे पोलीस महानिरीक्षक अनिल कुमार यांनी दिली. या अपघातातून 8 लोकांना वाचवण्यात आल्याचंही कुमार यांनी सांगितली. यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री दिनेश चंद्र यादव माध्यमांसमोर आले.  

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहार