शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

देशात महागाई वाढली, तरी सरकार आकडेमोडीत व्यग्र; काँग्रेसचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 09:09 IST

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

नवी दिल्ली - केंद्र सरकार जनतेच्या हिताचे काम करण्याऐवजी केवळ प्रसिद्धीत आणि आकडेमोड करण्यात गुंतले असल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेसने केला. सरकारचे संपूर्ण लक्ष महागाई कमी करण्यावर नसून आकडे कमी दाखविण्यावर असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांकाची आकडेवारी अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे की, महागाई नियंत्रणात येईल, तर सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा सातत्याने वाढत असल्याचे वास्तव आहे. 

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. खाद्यपदार्थ, इंधन आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः डाळी, तेल, भाजीपाला आणि दूध यासारख्या अत्यावश्यक अन्नपदार्थांच्या किमतींचा भडका उडाला आहे. त्याचा सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोल आणि डिझेल महागले. त्यामुळे वाहतूक आणि इतर सेवांचा खर्च वाढला. आज महागाई वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती आहेत. अशामध्ये सरकार महागाई कमी करण्यापेक्षा आकडे कमी करण्यालाच प्राधान्य असल्याचा दावा रमेश यांनी केला.

आकडेमोड करून देशाची दिशाभूलमहागाई कमी दाखविण्याचा हा सरकारचा पहिलाच प्रयत्न नाही. केंद्र सरकारने वारंवार आकडेमोड करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा भाजप सरकार जीडीपी विकास दरात यूपीए सरकारपेक्षा मागे पडू लागले तेव्हा आधार वर्ष बदलून विकास दर कृत्रिमरीत्या वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. असे करून देशाची खरी आर्थिक स्थिती लपवली गेली, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाInflationमहागाईCentral Governmentकेंद्र सरकार