शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

देशात महागाई वाढली, तरी सरकार आकडेमोडीत व्यग्र; काँग्रेसचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 09:09 IST

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

नवी दिल्ली - केंद्र सरकार जनतेच्या हिताचे काम करण्याऐवजी केवळ प्रसिद्धीत आणि आकडेमोड करण्यात गुंतले असल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेसने केला. सरकारचे संपूर्ण लक्ष महागाई कमी करण्यावर नसून आकडे कमी दाखविण्यावर असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांकाची आकडेवारी अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे की, महागाई नियंत्रणात येईल, तर सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा सातत्याने वाढत असल्याचे वास्तव आहे. 

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. खाद्यपदार्थ, इंधन आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः डाळी, तेल, भाजीपाला आणि दूध यासारख्या अत्यावश्यक अन्नपदार्थांच्या किमतींचा भडका उडाला आहे. त्याचा सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोल आणि डिझेल महागले. त्यामुळे वाहतूक आणि इतर सेवांचा खर्च वाढला. आज महागाई वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती आहेत. अशामध्ये सरकार महागाई कमी करण्यापेक्षा आकडे कमी करण्यालाच प्राधान्य असल्याचा दावा रमेश यांनी केला.

आकडेमोड करून देशाची दिशाभूलमहागाई कमी दाखविण्याचा हा सरकारचा पहिलाच प्रयत्न नाही. केंद्र सरकारने वारंवार आकडेमोड करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा भाजप सरकार जीडीपी विकास दरात यूपीए सरकारपेक्षा मागे पडू लागले तेव्हा आधार वर्ष बदलून विकास दर कृत्रिमरीत्या वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. असे करून देशाची खरी आर्थिक स्थिती लपवली गेली, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाInflationमहागाईCentral Governmentकेंद्र सरकार