शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

देशात महागाई वाढली, तरी सरकार आकडेमोडीत व्यग्र; काँग्रेसचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 09:09 IST

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

नवी दिल्ली - केंद्र सरकार जनतेच्या हिताचे काम करण्याऐवजी केवळ प्रसिद्धीत आणि आकडेमोड करण्यात गुंतले असल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेसने केला. सरकारचे संपूर्ण लक्ष महागाई कमी करण्यावर नसून आकडे कमी दाखविण्यावर असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांकाची आकडेवारी अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे की, महागाई नियंत्रणात येईल, तर सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा सातत्याने वाढत असल्याचे वास्तव आहे. 

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. खाद्यपदार्थ, इंधन आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः डाळी, तेल, भाजीपाला आणि दूध यासारख्या अत्यावश्यक अन्नपदार्थांच्या किमतींचा भडका उडाला आहे. त्याचा सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोल आणि डिझेल महागले. त्यामुळे वाहतूक आणि इतर सेवांचा खर्च वाढला. आज महागाई वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती आहेत. अशामध्ये सरकार महागाई कमी करण्यापेक्षा आकडे कमी करण्यालाच प्राधान्य असल्याचा दावा रमेश यांनी केला.

आकडेमोड करून देशाची दिशाभूलमहागाई कमी दाखविण्याचा हा सरकारचा पहिलाच प्रयत्न नाही. केंद्र सरकारने वारंवार आकडेमोड करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा भाजप सरकार जीडीपी विकास दरात यूपीए सरकारपेक्षा मागे पडू लागले तेव्हा आधार वर्ष बदलून विकास दर कृत्रिमरीत्या वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. असे करून देशाची खरी आर्थिक स्थिती लपवली गेली, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाInflationमहागाईCentral Governmentकेंद्र सरकार