शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
4
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
5
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
6
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
7
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
8
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
9
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
10
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
11
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
12
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
13
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
14
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
15
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
16
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
17
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
18
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
19
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी कायदा करण्यास सरकार तयार; मात्र आचारसंहितेमुळे अडचण - इंद्रेश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 10:20 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी राम मंदिरावरून सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठावर टीका केली आहे. 

ठळक मुद्देराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी राम मंदिरावरून सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठावर टीका केली आहे.  'राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचा कायदा आणण्याचा विचार आहे. मात्र, विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अडचण होत आहे' तुम्ही न्याय द्यायला तयार नसाल तर न्यायाधीश पदावर आपण रहावं की राजीनामा द्यावा याचा विचार त्यांनी करायला हवा - इंद्रेश कुमार

नवी दिल्ली - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांना पुन्हा प्रभू रामाची आठवण झाली आहे. सध्या देशभरात राम मंदिर मुद्याचं प्रचंड राजकारण सुरू आहे. राम मंदिर उभारणीच्या मागणीवरुन राजकीय नेतेमंडळी मोठ-मोठी विधानं करताना दिसत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी राम मंदिरावरून सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठावर टीका केली आहे. 

'राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचा कायदा आणण्याचा विचार आहे. मात्र, विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अडचण होत आहे' असे इंद्रेश कुमार यांनी म्हटलं आहे. मंगळवारी (27 नोव्हेंबर) पंजाब विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जोशी फाऊंडेशनच्या वतीने ‘रामजन्मभूमीवर अन्याय का?’ या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. तसेच त्यावेळी इंद्रेश कुमार यांनी अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलणाऱ्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठावरही टीका केली. 

‘सरकारच्या कायद्याविरोधात एखादी व्यक्ती कोर्टात गेली तर  सरन्यायाधीश या कायद्याला स्थगितीही देऊ शकतात. मला त्यांची नावं घ्यायची नाही कारण 125 कोटी भारतीयांना त्यांची नावं माहिती आहेत. तेच तीन न्यायाधीश ज्यांनी राम मंदिरावर निर्णय द्यायला उशीर केला. जनतेच्या भावनांचा अपमान केला, हे त्यांनी चांगलं केलेलं नाही. देश इतका अपंग झालाय का? की, दोन-तीन न्यायाधीश देशातील लोकांचा विश्वास, लोकशाही, संविधान आणि मूलभूत अधिकारांना थांबवू शकतात.’ असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं आहे. 

इंद्रेश कुमार यांनी 'लोकांच्या भावनांचा अनादर करुन त्यांना न्याय द्यायला उशीर करणाऱ्या भारतीय न्यायव्यवस्थेचा काळा दिवस आपण पाहिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि न्यायाधीशांनी काहीही केलेलं नाही. खंडपीठाच्या सदस्यांनी न्याय नाकारल्याने आमच्या वेदना वाढत आहेत. जर तुम्ही न्याय द्यायला तयार नसाल तर न्यायाधीश पदावर आपण रहावं की राजीनामा द्यावा याचा विचार त्यांनी करायला हवा', अशा  शब्दांत अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय खंडपीठावर टीका केली आहे. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय