शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Indo-Pak War 1971: पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेशाची निर्मिती; अखेर का झालं होतं भारत-पाक युद्ध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 09:24 IST

Vijay Diwas: १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि नव्या बांगलादेशाची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर बांगलादेशाच्या निर्मितीची तयारी झाली

नवी दिल्ली – १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं होतं. १९६५ नंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. इतकचं नाही तर १९७१ च्या युद्धानंतर जगाच्या नकाशात आणखी एका देशाचा जन्म झाला. २४ वर्षातच पाकिस्तानचं विभाजन का झालं? असा प्रश्न निर्माण होऊ लागला. बांगलादेशाच्या निर्मितीचं बीज १९४७ मध्येच रोवलं गेले होते. भारत बांगलादेशाच्या पाठिमागे ठामपणे उभा राहिला.

१६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि नव्या बांगलादेशाची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर बांगलादेशाच्या निर्मितीची तयारी झाली. बंगाली अस्मिता आणि त्याची ओळख टिकवण्यासाठी तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जातीय संघर्षाला सुरुवात झाली. परंतु त्याची सुरुवात १९५० मध्ये झाली होती. याचवर्षी भारतात संविधान लागू करण्यात आले होते ते पाहता पाकिस्ताननेही त्याची तयारी सुरू केली. त्या काळात पूर्व पाकिस्तानात बंगालींनी बांग्ला भाषेच्या उचित सन्मान देण्याच्या मागणीवरुन आंदोलन पुकारलं. काही दिवसांनी हे आंदोलन संपलं परंतु त्या मागणीनं हळूहळू बंडाची सुरुवात झाली.

पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात वादाची ठिणगी

भारत-पाक विभाजनानंतर पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिमी भागातील लोकांमध्ये वारंवार संघर्ष वाढला. भाषा, संस्कृती, राहणीमान, विचारांवर हा वाद पेटला. शेख मुजीबुर्रहमान यांनी पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला. या सर्व घडामोडींमुळे अनेक बंगाली नेते पाकिस्तानच्या निशाण्यावर आले. पाकिस्तान दबावाखाली शेख मुजीबुर्रहमान आणि अन्य लोकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र ही कारवाई पाकिस्तावर भारी पडली. पूर्व पाकिस्तान पाक लष्कराचा अत्याचार वाढत चालला होता. मार्च १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने हद्द पार केली. पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लोकांची निर्दयी हत्या केली. महिलांसोबत बलात्कार या घटना रोज घडत होत्या. त्यावेळी पूर्व पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या शरणार्थींची संख्या वाढली. पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारतावर दबाव वाढला. २९ जुलै १९७१ रोजी भारतीय संसदेत पूर्व बंगालच्या सैनिकांना मदत करण्याची घोषणा केली गेली. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांवर हल्ले केले. तेव्हा भारताला युद्ध करण्याची घोषणा करावी लागली. अवघ्या १३ दिवसांत १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करत भारतासमोर हार मानली. त्यानंतर जगाच्या नकाशात बांगलादेशाची निर्मिती झाली.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश