शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Indo-Pak War 1971: पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेशाची निर्मिती; अखेर का झालं होतं भारत-पाक युद्ध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 09:24 IST

Vijay Diwas: १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि नव्या बांगलादेशाची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर बांगलादेशाच्या निर्मितीची तयारी झाली

नवी दिल्ली – १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं होतं. १९६५ नंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. इतकचं नाही तर १९७१ च्या युद्धानंतर जगाच्या नकाशात आणखी एका देशाचा जन्म झाला. २४ वर्षातच पाकिस्तानचं विभाजन का झालं? असा प्रश्न निर्माण होऊ लागला. बांगलादेशाच्या निर्मितीचं बीज १९४७ मध्येच रोवलं गेले होते. भारत बांगलादेशाच्या पाठिमागे ठामपणे उभा राहिला.

१६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि नव्या बांगलादेशाची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर बांगलादेशाच्या निर्मितीची तयारी झाली. बंगाली अस्मिता आणि त्याची ओळख टिकवण्यासाठी तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जातीय संघर्षाला सुरुवात झाली. परंतु त्याची सुरुवात १९५० मध्ये झाली होती. याचवर्षी भारतात संविधान लागू करण्यात आले होते ते पाहता पाकिस्ताननेही त्याची तयारी सुरू केली. त्या काळात पूर्व पाकिस्तानात बंगालींनी बांग्ला भाषेच्या उचित सन्मान देण्याच्या मागणीवरुन आंदोलन पुकारलं. काही दिवसांनी हे आंदोलन संपलं परंतु त्या मागणीनं हळूहळू बंडाची सुरुवात झाली.

पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात वादाची ठिणगी

भारत-पाक विभाजनानंतर पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिमी भागातील लोकांमध्ये वारंवार संघर्ष वाढला. भाषा, संस्कृती, राहणीमान, विचारांवर हा वाद पेटला. शेख मुजीबुर्रहमान यांनी पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला. या सर्व घडामोडींमुळे अनेक बंगाली नेते पाकिस्तानच्या निशाण्यावर आले. पाकिस्तान दबावाखाली शेख मुजीबुर्रहमान आणि अन्य लोकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र ही कारवाई पाकिस्तावर भारी पडली. पूर्व पाकिस्तान पाक लष्कराचा अत्याचार वाढत चालला होता. मार्च १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने हद्द पार केली. पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लोकांची निर्दयी हत्या केली. महिलांसोबत बलात्कार या घटना रोज घडत होत्या. त्यावेळी पूर्व पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या शरणार्थींची संख्या वाढली. पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारतावर दबाव वाढला. २९ जुलै १९७१ रोजी भारतीय संसदेत पूर्व बंगालच्या सैनिकांना मदत करण्याची घोषणा केली गेली. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांवर हल्ले केले. तेव्हा भारताला युद्ध करण्याची घोषणा करावी लागली. अवघ्या १३ दिवसांत १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करत भारतासमोर हार मानली. त्यानंतर जगाच्या नकाशात बांगलादेशाची निर्मिती झाली.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश