शहरं
Join us  
Trending Stories
1
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
2
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
3
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
4
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
5
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
6
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
7
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
8
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
9
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
10
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
11
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
12
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
13
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
14
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
15
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
17
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
18
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
19
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
20
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका

Indo-Pak War 1971: पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेशाची निर्मिती; अखेर का झालं होतं भारत-पाक युद्ध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 09:24 IST

Vijay Diwas: १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि नव्या बांगलादेशाची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर बांगलादेशाच्या निर्मितीची तयारी झाली

नवी दिल्ली – १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं होतं. १९६५ नंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. इतकचं नाही तर १९७१ च्या युद्धानंतर जगाच्या नकाशात आणखी एका देशाचा जन्म झाला. २४ वर्षातच पाकिस्तानचं विभाजन का झालं? असा प्रश्न निर्माण होऊ लागला. बांगलादेशाच्या निर्मितीचं बीज १९४७ मध्येच रोवलं गेले होते. भारत बांगलादेशाच्या पाठिमागे ठामपणे उभा राहिला.

१६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि नव्या बांगलादेशाची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर बांगलादेशाच्या निर्मितीची तयारी झाली. बंगाली अस्मिता आणि त्याची ओळख टिकवण्यासाठी तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जातीय संघर्षाला सुरुवात झाली. परंतु त्याची सुरुवात १९५० मध्ये झाली होती. याचवर्षी भारतात संविधान लागू करण्यात आले होते ते पाहता पाकिस्ताननेही त्याची तयारी सुरू केली. त्या काळात पूर्व पाकिस्तानात बंगालींनी बांग्ला भाषेच्या उचित सन्मान देण्याच्या मागणीवरुन आंदोलन पुकारलं. काही दिवसांनी हे आंदोलन संपलं परंतु त्या मागणीनं हळूहळू बंडाची सुरुवात झाली.

पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात वादाची ठिणगी

भारत-पाक विभाजनानंतर पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिमी भागातील लोकांमध्ये वारंवार संघर्ष वाढला. भाषा, संस्कृती, राहणीमान, विचारांवर हा वाद पेटला. शेख मुजीबुर्रहमान यांनी पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला. या सर्व घडामोडींमुळे अनेक बंगाली नेते पाकिस्तानच्या निशाण्यावर आले. पाकिस्तान दबावाखाली शेख मुजीबुर्रहमान आणि अन्य लोकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र ही कारवाई पाकिस्तावर भारी पडली. पूर्व पाकिस्तान पाक लष्कराचा अत्याचार वाढत चालला होता. मार्च १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने हद्द पार केली. पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लोकांची निर्दयी हत्या केली. महिलांसोबत बलात्कार या घटना रोज घडत होत्या. त्यावेळी पूर्व पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या शरणार्थींची संख्या वाढली. पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारतावर दबाव वाढला. २९ जुलै १९७१ रोजी भारतीय संसदेत पूर्व बंगालच्या सैनिकांना मदत करण्याची घोषणा केली गेली. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांवर हल्ले केले. तेव्हा भारताला युद्ध करण्याची घोषणा करावी लागली. अवघ्या १३ दिवसांत १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करत भारतासमोर हार मानली. त्यानंतर जगाच्या नकाशात बांगलादेशाची निर्मिती झाली.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश