शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

भारत-चीन यांच्यात व्यापरयुद्ध सुरु; चिनी साहित्याची बंदरात तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 23:52 IST

व्यापारयुद्ध । भारतीय औषध कंपन्यांना फटका बसणार

टेकचंद सोनवणे 

नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांचा आता अर्थकारणावरही परिणाम दिसू लागला आहे. चिनी वस्तूंच्या निर्यातीवर आता भारताने कठोर निर्बंध घातले आहेत. चीनमधून येणाऱ्या प्रत्येक वस्तूची तपासणी केली जात आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतीय बंदरात अडकून पडल्या आहेत. कोलकाता व मुंबई बंदरावर सर्वाधिक चिनी वस्तू पडून आहेत. त्याचा परिणाम वस्त्रोद्योगावरही झाला. वाणिज्य मंत्रालयाने चीन, हाँगकाँग व तैवानमधून येणाऱ्या सामानाची पूर्ण तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तशी सूचनाही सीमा शुल्क विभागास देण्यात आली. कापड उद्योगाला या विलंबाचा कोट्यवधी रुपयांचा फटका बसेल, अशी भीती अ‍ॅपारल एक्स्पोर्ट प्रमोशन कॉन्सिलने (एईपीसी) व्यक्त केली आहे.

वाणिज्य मंत्रालयाला संघटनेचे अध्यक्ष ए. शक्तीवल यांनी पत्रही लिहून ही कोंडी लवकर फोडण्याची विनंती केली. भारताप्रमाणे चीननेदेखील रसायनांच्या निर्यातीसाठी भारताची कोंडी केली आहे. हाँगकाँगच्या बंदरात भारतीय कंपन्यांचे सामान अडकून पडले आहे. एईपीसीने पत्रात म्हटले आहे की, देशात लॉकडाऊन संपेल. जनजीवन पूर्ववत सुरू होईल. कपड्यांची मागणी वाढेल. गेल्या तीन महिन्यांत हा व्यवसाय ठप्प होता. अशावेळी आता पुन्हा विलंब होणे आर्थिक संकट वाढवणारे असेल. मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकात्यामध्ये सीमा शुल्क विभागाची परवानगी अद्याप मिळाली नाही. प्रत्येक बॉक्सची कसून तपासणी होत आहे. यामुळे भारतीय व्यापाऱ्यांनादेखील पुढे निर्यातीला विलंब होईल.

भारतीय औषध व्यवसाय ७० टक्के चीनवर अवलंबून आहे. चीनने नेमकी हीच दुखरी नस पकडली. हाँगकाँग, गाँगझो, शेनजेन या मुख्य बंदरांत चिनी कंपन्यांनी भारतात पाठवलेला माल रोखण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या उद्योजकांमध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे. गलवान खोºयातील हिंसक झटापट, चीनची भारतीय हद्दीतील कथित घुसखोरी यामुळे भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली. चिनी वस्तूंवर बहिष्काराचेही अनेक संस्थांनी आवाहन केले आहे. चीनमधून येणाºया छोट्या-मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भारताची नजर आहे. चीनमधून येणाºया वस्तूंची अडवणूक करून भारताने जशास तशे उत्तर दिले. लष्करी, राजनैतिक चर्चा सुरू ठेवून घुसखोरी करू पाहणाºया चीनला आतापर्यंत ऊर्जा, दूरसंचारपाठोपाठ वाणिज्य मंत्रालयानेदेखील कठोर संदेश दिला आहे.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनEconomyअर्थव्यवस्था