शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

..त्यावेळी गुजरातला आलेल्या इंदिरा गांधींनी नाकावर धरला होता रुमाल - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 18:09 IST

काँग्रेसला गरीबविरोधी पक्ष ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी पुन्हा एकदा काँग्रेसवर उच्चभ्रूंचा पक्ष असल्याचा आरोप केला.

ठळक मुद्देमोदींच्या सभेसाठी 1200 खुर्च्यांची सोय करण्यात आली होती. मात्र त्यातील फक्त 400 खुर्च्यांवर लोक बसले होते आणि 800 खुर्च्या खाली होत्या.      

अहमदाबाद- काँग्रेसला गरीबविरोधी पक्ष ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी पुन्हा एकदा काँग्रेसवर उच्चभ्रूंचा पक्ष असल्याचा आरोप केला. त्यासाठी त्यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींचे उदहारण दिले. इंदिरा गांधी एकदा मोरबीमध्ये आल्या होत्या. त्यावेळी चित्रलेखा मासिकात प्रसिद्ध झालेला त्यांचा फोटो आजही मला आठवतो. मोरबीच्या रस्त्यावर घाण वास येत असल्यामुळे इंदिरा गांधींनी नाकावर रुमाल धरला होता. पण जनसंघ आणि आरएसएससाठी मोरबीचे रस्ते सुगंधी होते. मानवतेचा तो सुंगध होता असे पंतप्रधान मोरबी येथील सभेत म्हणाले. 

चांगल्या आणि वाईट काळात आम्ही मोरबीच्या जनतेसोबत होतो. पण काँग्रेसबद्दल हेच बोलता येणार नाही. आम्ही सत्तेत आलो तेव्हा कच्छ आणि सौराष्ट्रामध्ये पाणी टंचाई मुख्य समस्या होती. काँग्रेससाठी हँडपंप देणे हा विकास होता पण भाजपाने सिंचन योजना आणि मोठया पाईप लाईन टाकून नर्मदेचे पाणी आणले असे मोदींनी सांगितले. 

182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत मोरबीमध्ये तीन जागा आहेत. भाजपाकडे दोन, काँग्रेसकडे एक जागा आहे. मोरबीची एकूण उलाढाल 25 हजार कोटींची आहे. एकूण दहा लाख लोक मोरबीमध्ये नोकरी करतात. मोरबी सौराष्ट्राच्या मध्यभागी असून सिरॅमिक टाइल निर्मितीचे मुख्य केंद्र आहे. हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली पटेल आरक्षण आंदोलनाचे मोरबी मुख्य केंद्र होते.        

मोदी लाट ओसरली!गुजरातमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची जादू चालली होती. एकप्रकारे त्यांची लाटच आली होती. मोंदीच्या लाटेमुळे भाजपानं केंद्रात एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यासारख्या राज्यामध्ये भाजपा सत्तेत आली. पण सध्या गुजरातमध्ये नरेंद्र मोदीं यांची लाट ओसरल्याचे दिसत आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जसदणमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती. मिळालेल्या वृत्ताननुसार, त्यांच्या या सभेसाठी 1200 खुर्च्यांची सोय करण्यात आली होती. मात्र त्यातील फक्त 400 खुर्च्यांवर लोक बसले होते आणि 800 खुर्च्या खाली होत्या.                                                                              

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदी