शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकारमध्ये बंडखोरीचे संकेत; दिनेश खटिक यांचा राजीनामा, जितीन प्रसाद शहांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 06:32 IST

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार १०० दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असले तरी राज्य सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

राजेंद्रकुमार, लोकमत न्यूज नेटवर्क

लखनौ : उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ सरकार १०० दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असले तरी राज्य सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाममंत्री मंत्री जितीन प्रसाद व जलशक्ती राज्यमंत्री दिनेश खटिक यांनी योगी सरकारच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.

खटिक यांनी राजीनामापत्र मुख्यमंत्री व राज्यपालांना तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवले आहे. नमामि गंगे योजनेतील भ्रष्टाचार, बदल्या, मंत्र्याने कोणतेही काम न देणे, तसेच अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. आपण दलित असल्यामुळे अधिकाऱ्यांनी उपेक्षा केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.

अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे योगी सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री नाराज आहेत. जितीन प्रसाद व उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांच्या नाराजीची वेगळी कारणे आहेत. या दोन खात्यांमध्ये झालेल्या बदल्यांपासून मुख्यमंत्री स्तरावर मोठ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही. तर पाठक यांनी बदल्यांबाबत आरोग्य अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून उत्तर मागितले होते, ते अद्याप मिळालेले नाही. ते वारंवार आरोग्य विभागाला लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते; परंतु खात्याचे अधिकारी त्यांचे ऐकतच नाहीत.

नाराजी दूर केली जाणार?

जितीन प्रसाद व दिनेश खटिक केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर हा प्रकार घालण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. लवकरच केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्र्यांसमवेत नाराज मंत्र्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश