शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

योगी सरकारमध्ये बंडखोरीचे संकेत; दिनेश खटिक यांचा राजीनामा, जितीन प्रसाद शहांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 06:32 IST

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार १०० दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असले तरी राज्य सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

राजेंद्रकुमार, लोकमत न्यूज नेटवर्क

लखनौ : उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ सरकार १०० दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असले तरी राज्य सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाममंत्री मंत्री जितीन प्रसाद व जलशक्ती राज्यमंत्री दिनेश खटिक यांनी योगी सरकारच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.

खटिक यांनी राजीनामापत्र मुख्यमंत्री व राज्यपालांना तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवले आहे. नमामि गंगे योजनेतील भ्रष्टाचार, बदल्या, मंत्र्याने कोणतेही काम न देणे, तसेच अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. आपण दलित असल्यामुळे अधिकाऱ्यांनी उपेक्षा केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.

अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे योगी सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री नाराज आहेत. जितीन प्रसाद व उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांच्या नाराजीची वेगळी कारणे आहेत. या दोन खात्यांमध्ये झालेल्या बदल्यांपासून मुख्यमंत्री स्तरावर मोठ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही. तर पाठक यांनी बदल्यांबाबत आरोग्य अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून उत्तर मागितले होते, ते अद्याप मिळालेले नाही. ते वारंवार आरोग्य विभागाला लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते; परंतु खात्याचे अधिकारी त्यांचे ऐकतच नाहीत.

नाराजी दूर केली जाणार?

जितीन प्रसाद व दिनेश खटिक केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर हा प्रकार घालण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. लवकरच केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्र्यांसमवेत नाराज मंत्र्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश