शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिस-या वनडेमध्ये भारतापुढे २२८ धावांचे लक्ष्य

By admin | Updated: August 30, 2014 18:15 IST

भारतीय संघाने तिस-या सामन्यात इंग्लंडचा डाव २२७ धावांवर गुंडाळला असून विजयासाठी भारताला ५० षटकांमध्ये २२८ धावा करायच्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
ट्रेंटब्रिज (इंग्लंड), दि. ३० - एकदिवसीय मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाने तिस-या सामन्यात इंग्लंडचा डाव २२७ धावांवर गुंडाळला असून विजयासाठी भारताला ५० षटकांमध्ये २२८ धावा करायच्या आहेत. रोहित शर्माच्या जागी अंबती रायडूला घेण्यात आले असून बाकीचा संघ तोच ठेवण्यात आला आहे. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी करत ढोणीचा विश्वास सार्थ ठरवला. डावाला सुरुवात झाल्यापासून ठराविक अंतराने इंग्लंडच्या विकेट्स पडल्याने यजमानांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच मिळाली नाही.
आर आश्विनने तीन बळी टिपत महत्त्वाची भूमिका बजावली तर शामी, जाडेजा, रैना, भुवनेश्वरकुमार व रायडूने प्रत्येकी एक बळी टिपला. दोन फलंदाजांना भारतीय क्षेत्ररक्षकांनी धावचीत केले. सलामीवीर एलेस्टर कुकने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर हेल्स, बेल व बटलरने थोडाफार बरा खेळ करत इंग्लंडला दोनशेंची धावसंख्या पार करून दिली. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावणा-या बटलरने ५८ चेंडूंमध्ये ४२ धावा करत धावसंख्येला आकार दिला. भुवनेश्वरकुमारच्या शेवटच्या षटकात १७ धावा गेल्यामुळे इंग्लंडने २२५चा आकडा पार केला. मात्र या षटकांमध्ये २ गडी बाद झाल्याने धावसंख्या आणखी वाढली नाही आणि इंग्लंडचा डाव २२७ धावांवर आटोपला.