शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

तिस-या वनडेमध्ये भारतापुढे २२८ धावांचे लक्ष्य

By admin | Updated: August 30, 2014 18:15 IST

भारतीय संघाने तिस-या सामन्यात इंग्लंडचा डाव २२७ धावांवर गुंडाळला असून विजयासाठी भारताला ५० षटकांमध्ये २२८ धावा करायच्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
ट्रेंटब्रिज (इंग्लंड), दि. ३० - एकदिवसीय मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाने तिस-या सामन्यात इंग्लंडचा डाव २२७ धावांवर गुंडाळला असून विजयासाठी भारताला ५० षटकांमध्ये २२८ धावा करायच्या आहेत. रोहित शर्माच्या जागी अंबती रायडूला घेण्यात आले असून बाकीचा संघ तोच ठेवण्यात आला आहे. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी करत ढोणीचा विश्वास सार्थ ठरवला. डावाला सुरुवात झाल्यापासून ठराविक अंतराने इंग्लंडच्या विकेट्स पडल्याने यजमानांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच मिळाली नाही.
आर आश्विनने तीन बळी टिपत महत्त्वाची भूमिका बजावली तर शामी, जाडेजा, रैना, भुवनेश्वरकुमार व रायडूने प्रत्येकी एक बळी टिपला. दोन फलंदाजांना भारतीय क्षेत्ररक्षकांनी धावचीत केले. सलामीवीर एलेस्टर कुकने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर हेल्स, बेल व बटलरने थोडाफार बरा खेळ करत इंग्लंडला दोनशेंची धावसंख्या पार करून दिली. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावणा-या बटलरने ५८ चेंडूंमध्ये ४२ धावा करत धावसंख्येला आकार दिला. भुवनेश्वरकुमारच्या शेवटच्या षटकात १७ धावा गेल्यामुळे इंग्लंडने २२५चा आकडा पार केला. मात्र या षटकांमध्ये २ गडी बाद झाल्याने धावसंख्या आणखी वाढली नाही आणि इंग्लंडचा डाव २२७ धावांवर आटोपला.