शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भारताच्या लोकसंख्येत प्रतिवर्ष 1.2 टक्क्यांनी वाढ, भविष्यात उभं राहणारं मोठं संकट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 14:13 IST

भारताच्या लोकसंख्येत गेल्या 9 वर्षात प्रचंड वाढ होत असल्याचं समोर आलंय, 2010 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या 1.2 टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीत समोर आलंय

नवी दिल्ली - भारताच्या लोकसंख्येत गेल्या 9 वर्षात प्रचंड वाढ होत असल्याचं समोर आलंय, 2010 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या 1.2 टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीत समोर आलंय. भारताच्या तुलनेत जागतिक दरात लोकसंख्येत 1.1 टक्क्यांनी वाढ होते. लोकसंख्या वाढीची टक्केवारी चीनपेक्षा दुप्पट असल्याचं दिसून आलं. 2010-19 या कालावधीत चीनची लोकसंख्या प्रत्येकी वर्षी 0.5 टक्क्यांनी वाढत आहे. संयुक्त राष्ट्र जनसंख्येचा स्टेट ऑफ वर्ल़्ड पॉप्युलेशन 2018 रिपोर्ट बुधवारी जाहीर करण्यात आला. 

जागतिक लोकसंख्येचा आकडा 2019 मध्ये 771.5 करोडपर्यंत वाढला आहे. मागील वर्षी हाच आकडा 763.3 करोड होता. तर सरासरी 72 वर्ष माणसाचं आयुष्य दर आहे. अल्प विकसित देशांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर येते. आफ्रीका खंडातील देशांमध्ये प्रत्येक वर्षी 2.7 टक्क्यांनी लोकसंख्या वाढत आहे. यूएनएफपीए या संस्थेची स्थापना होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली. लोकसंख्या कमी करण्याच्या उद्देशाने जगातील देशांनी एकत्र येत या संस्थेची स्थापना केली होती. 2050 पर्यंत जागतिक लोकसंख्या वाढीमध्ये आफ्रिकी देश आणि भारत, नायजेरियासारख्या देशांचा समावेश असणार आहे. भारताच्या 24 राज्यांमध्ये प्रति महिला 2.1 प्रजनन दर आहे. मात्र भविष्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. 

भारताची वाढती लोकसंख्या भविष्यात देशासाठी चिंतेचा विषय आहे. युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, आरोग्य आणि अर्थव्यवस्था यासाठी भारताने सज्ज राहायला हवं. कारण वाढत्या लोकसंख्येसोबत या समस्यांना भारताला तोंड द्यावं लागेल असा इशारा यूनएनएफपीए इंडियाचे अधिकारी चार्ज क्लॉस बैक यांनी दिला आहे. 

लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी भारताला इतर देशांकडून शिकावं लागेल. सर्वात गरिब 20 टक्के घरांमध्ये गर्भनिरोधक आणि आरोग्य सेवांची गरजेची आहे. चीनने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली. भारताने देखील योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे निवारा, अन्नाचा तुटवडा, मुलभूत सुविधांचा अभाव अशी अनेक संकटे भारतासमोर भविष्यात उभी राहतील.  

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिकाchinaचीन