शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या लोकसंख्येत प्रतिवर्ष 1.2 टक्क्यांनी वाढ, भविष्यात उभं राहणारं मोठं संकट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 14:13 IST

भारताच्या लोकसंख्येत गेल्या 9 वर्षात प्रचंड वाढ होत असल्याचं समोर आलंय, 2010 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या 1.2 टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीत समोर आलंय

नवी दिल्ली - भारताच्या लोकसंख्येत गेल्या 9 वर्षात प्रचंड वाढ होत असल्याचं समोर आलंय, 2010 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या 1.2 टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीत समोर आलंय. भारताच्या तुलनेत जागतिक दरात लोकसंख्येत 1.1 टक्क्यांनी वाढ होते. लोकसंख्या वाढीची टक्केवारी चीनपेक्षा दुप्पट असल्याचं दिसून आलं. 2010-19 या कालावधीत चीनची लोकसंख्या प्रत्येकी वर्षी 0.5 टक्क्यांनी वाढत आहे. संयुक्त राष्ट्र जनसंख्येचा स्टेट ऑफ वर्ल़्ड पॉप्युलेशन 2018 रिपोर्ट बुधवारी जाहीर करण्यात आला. 

जागतिक लोकसंख्येचा आकडा 2019 मध्ये 771.5 करोडपर्यंत वाढला आहे. मागील वर्षी हाच आकडा 763.3 करोड होता. तर सरासरी 72 वर्ष माणसाचं आयुष्य दर आहे. अल्प विकसित देशांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर येते. आफ्रीका खंडातील देशांमध्ये प्रत्येक वर्षी 2.7 टक्क्यांनी लोकसंख्या वाढत आहे. यूएनएफपीए या संस्थेची स्थापना होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली. लोकसंख्या कमी करण्याच्या उद्देशाने जगातील देशांनी एकत्र येत या संस्थेची स्थापना केली होती. 2050 पर्यंत जागतिक लोकसंख्या वाढीमध्ये आफ्रिकी देश आणि भारत, नायजेरियासारख्या देशांचा समावेश असणार आहे. भारताच्या 24 राज्यांमध्ये प्रति महिला 2.1 प्रजनन दर आहे. मात्र भविष्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. 

भारताची वाढती लोकसंख्या भविष्यात देशासाठी चिंतेचा विषय आहे. युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, आरोग्य आणि अर्थव्यवस्था यासाठी भारताने सज्ज राहायला हवं. कारण वाढत्या लोकसंख्येसोबत या समस्यांना भारताला तोंड द्यावं लागेल असा इशारा यूनएनएफपीए इंडियाचे अधिकारी चार्ज क्लॉस बैक यांनी दिला आहे. 

लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी भारताला इतर देशांकडून शिकावं लागेल. सर्वात गरिब 20 टक्के घरांमध्ये गर्भनिरोधक आणि आरोग्य सेवांची गरजेची आहे. चीनने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली. भारताने देखील योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे निवारा, अन्नाचा तुटवडा, मुलभूत सुविधांचा अभाव अशी अनेक संकटे भारतासमोर भविष्यात उभी राहतील.  

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिकाchinaचीन