शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या लोकसंख्येत प्रतिवर्ष 1.2 टक्क्यांनी वाढ, भविष्यात उभं राहणारं मोठं संकट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 14:13 IST

भारताच्या लोकसंख्येत गेल्या 9 वर्षात प्रचंड वाढ होत असल्याचं समोर आलंय, 2010 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या 1.2 टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीत समोर आलंय

नवी दिल्ली - भारताच्या लोकसंख्येत गेल्या 9 वर्षात प्रचंड वाढ होत असल्याचं समोर आलंय, 2010 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या 1.2 टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीत समोर आलंय. भारताच्या तुलनेत जागतिक दरात लोकसंख्येत 1.1 टक्क्यांनी वाढ होते. लोकसंख्या वाढीची टक्केवारी चीनपेक्षा दुप्पट असल्याचं दिसून आलं. 2010-19 या कालावधीत चीनची लोकसंख्या प्रत्येकी वर्षी 0.5 टक्क्यांनी वाढत आहे. संयुक्त राष्ट्र जनसंख्येचा स्टेट ऑफ वर्ल़्ड पॉप्युलेशन 2018 रिपोर्ट बुधवारी जाहीर करण्यात आला. 

जागतिक लोकसंख्येचा आकडा 2019 मध्ये 771.5 करोडपर्यंत वाढला आहे. मागील वर्षी हाच आकडा 763.3 करोड होता. तर सरासरी 72 वर्ष माणसाचं आयुष्य दर आहे. अल्प विकसित देशांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर येते. आफ्रीका खंडातील देशांमध्ये प्रत्येक वर्षी 2.7 टक्क्यांनी लोकसंख्या वाढत आहे. यूएनएफपीए या संस्थेची स्थापना होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली. लोकसंख्या कमी करण्याच्या उद्देशाने जगातील देशांनी एकत्र येत या संस्थेची स्थापना केली होती. 2050 पर्यंत जागतिक लोकसंख्या वाढीमध्ये आफ्रिकी देश आणि भारत, नायजेरियासारख्या देशांचा समावेश असणार आहे. भारताच्या 24 राज्यांमध्ये प्रति महिला 2.1 प्रजनन दर आहे. मात्र भविष्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. 

भारताची वाढती लोकसंख्या भविष्यात देशासाठी चिंतेचा विषय आहे. युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, आरोग्य आणि अर्थव्यवस्था यासाठी भारताने सज्ज राहायला हवं. कारण वाढत्या लोकसंख्येसोबत या समस्यांना भारताला तोंड द्यावं लागेल असा इशारा यूनएनएफपीए इंडियाचे अधिकारी चार्ज क्लॉस बैक यांनी दिला आहे. 

लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी भारताला इतर देशांकडून शिकावं लागेल. सर्वात गरिब 20 टक्के घरांमध्ये गर्भनिरोधक आणि आरोग्य सेवांची गरजेची आहे. चीनने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली. भारताने देखील योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे निवारा, अन्नाचा तुटवडा, मुलभूत सुविधांचा अभाव अशी अनेक संकटे भारतासमोर भविष्यात उभी राहतील.  

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिकाchinaचीन