शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

भारताची पुढील महत्त्वाकांक्षा अंतराळात स्वत:च्या तळाची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 07:40 IST

पृथ्वीपासून ४०० किमी उंचीवर अंतराळ स्थानक : ‘गगनयान’नंतर ‘इस्रो’ लागणार कामाला

नवी दिल्ली : नजीकच्या भविष्यात स्वत:चा स्वतंत्र अंतराळ तळ उभारण्याची भारताची योजना असून यानाने पहिला अंतराळवीर अंतरिक्षात पाठविण्याची ‘गगनयान’ मोहीम आॅगस्ट २०२२ मध्ये पार पाडल्यानंतर अंतराळतळाची योजना राबविण्याची तयारी जोमाने सुरू केली जाईल, असे भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. शिवन यांनी गुरुवारी सांगितले.

‘गगनयन’ मोहीम पार पडल्यानंतर अंतराळ तळ उभारणीच्या योजनेचा प्रकल्प अहवाल सरकारला सादर केला जाईल. अंतराळात अल्प गुरुत्वाकर्षणात नानाविध प्रयोग करण्यासाठी आपलाही स्वतंत्र अंतराळ तळ असावा, ही भारताची महत्त्वाकांक्षा आहे. तिला मूर्त रूप देण्यासाठी नेटाने प्रयत्न केले जातील.या प्रस्तावित अंतराळ तळाचा प्राथमिक तपशील देताना डॉ. शिवन म्हणाले की, हा कायमस्वरूपी तळ २० टन वजनाचे ‘मॉड्युल’ असेल अशी कल्पना आहे.पृथ्वीपासून ४०० किमी उंचीवर अंतराळ स्थानक असेल. तेथे अंतराळवीरांना सलग १५ ते २० दिवसांचा मुक्काम करण्याची सोय असेल.अंतराळ संशोधन खात्याचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ‘गगनयान’च्या प्रगतीची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी या मोहिमेसाठी १० हजार कोटींच्या मंजुरी दिली होती.पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे ७५ व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत किंवा त्याआधीही ही मोहीम पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे तेम्हणाले.‘गगनयान’चे ठोबळ स्वरूपच्‘इस्रो’च्या ‘जीएसएलव्ही-मार्क ३’ अग्निबाणाने उड्डाणच्२ किंवा ३ अंतराळवीरांची अंतराळ वारीच्त्यांचा सात दिवस अंतराळत मुक्कामच्यान पृथ्वीच्या कक्षेत ३०० ते ४०० किमी उंचीवरून घिरट्या घालेल.च्‘गगनयान’ साठी संभाव्य दोन-तीन अंतराळवीरांच्या निवडीचे सहा महिन्यांत सुरू होईल. त्यांना एक ते दीड वर्ष प्रशिक्षण दिले जाईल. च्सुरुवातीचे प्रशिक्षण भारतात तर प्रगत प्रशिक्षण परदेशात होईल.च्या मोहिमेसाठी विविध संस्था व उद्योगांचे प्रतिनिधित्व असलेली ‘राष्ट्रीय गगनयान सल्लागार परिषद’ स्थापन करण्यात आली आहे.च्अंतराळात माणूस पाठविण्याची स्वत:ची मोहीम राबविली तरी चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांच्या आंतररराष्ट्रीय चमूंमध्ये भारताचा सहभाग सुरूच राहणार आहे.

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत