शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भारतातील नैसर्गिक वायूचे साठे 45 वर्षे पुरतील, माहितीच्या अधिकारातून मिळाले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 14:53 IST

नोएडा- भारतामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यांवरुन हे साठे भारताला पुढील 45 वर्षे पुरतील असे उत्तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी भारतात 2005 पासून देशात नैसर्गिक वायूचे किती उत्पादन झाले, त्यामध्ये कोणत्या राज्याचा किती वाटा ...

ठळक मुद्देनैसर्गिक वायूच्या उत्पादनामध्ये वेस्टर्न ऑफशोअरचा सर्वात मोठा वाटा असून येथे एकूण उत्पादनापैकी 59 टक्के वायूचे उत्पादन होते.आसाम राज्यामध्ये 14 टक्के, गुजरातमध्ये 5 टक्के, तामिळनाडूमध्ये आणि राजस्थानात प्रत्येकी 4 टक्के उत्पादन होते.

नोएडा- भारतामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यांवरुन हे साठे भारताला पुढील 45 वर्षे पुरतील असे उत्तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी भारतात 2005 पासून देशात नैसर्गिक वायूचे किती उत्पादन झाले, त्यामध्ये कोणत्या राज्याचा किती वाटा आहे आणि हे साठे किती वर्षे पुरतील अशी माहिती विचारली होती. 2016-17 वर्षाच्या उत्पादनाची गती आणि 31 मार्च 2017 रोजी उपलब्ध असणाऱ्या साठ्यांचा विचार करता भारताला हे साठे पुढील 45 वर्षे पुरतील असे सारडा यांना मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे.

या उत्तरात 2004-05 या वर्षापासून नैसर्गिक वायू उत्पादनाची आरडेवारीही देण्यात आली आहे. 2004-05 या वर्षी भारतात 31.76 अब्ज क्युबिक मिटर्स नैसर्गिक वायूचे उत्पादन झाले. 2015-16 या वर्षी हे उत्पादन 32.25 अब्ज क्युबिक मिटर्स तर 2016-17 या वर्षी 31.90 अब्ज क्युबिक मिटर्स इतके उत्पादन झाले. या वर्षी म्हणजे 2017 साली ऑगस्ट महिन्यापर्यंत 13.69 अब्ज क्युबिक मिटर्स इतके नैसर्गिक वायूचे उत्पादन झालेले आहे.नैसर्गिक वायूच्या उत्पादनामध्ये वेस्टर्न ऑफशोअरचा सर्वात मोठा वाटा असून येथे एकूण उत्पादनापैकी 59 टक्के वायूचे उत्पादन होते. तर इस्टर्न ऑफशोअरवर 9 टक्के उत्पादन होते. आसाम राज्यामध्ये 14 टक्के, गुजरातमध्ये 5 टक्के, तामिळनाडूमध्ये आणि राजस्थानात प्रत्येकी 4 टक्के उत्पादन होते. इतर राज्यांमध्ये यापेक्षा कमी उत्पादन होते.नैसर्गिक वायूची दिवसेंदिवस वाढणारी गरज पाहता आणि तेलापेक्षा पर्यावरण पूरक म्हणून नैसर्गिक वायूला वाहनांमध्ये पसंती मिळत असताना नैसर्गिक वायूच्या उत्पादनाची गरज असल्याचे मत सारडा यांनी व्यक्त केले आहे. येणारी 100 वर्षांची गरज पूर्ण होईल इतक्या साठ्यांचा शोध व उत्पादन व्हावे अशी विनंती  प्रफु्ल्ल सारडा यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Indiaभारत