शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

भारतातील नैसर्गिक वायूचे साठे 45 वर्षे पुरतील, माहितीच्या अधिकारातून मिळाले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 14:53 IST

नोएडा- भारतामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यांवरुन हे साठे भारताला पुढील 45 वर्षे पुरतील असे उत्तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी भारतात 2005 पासून देशात नैसर्गिक वायूचे किती उत्पादन झाले, त्यामध्ये कोणत्या राज्याचा किती वाटा ...

ठळक मुद्देनैसर्गिक वायूच्या उत्पादनामध्ये वेस्टर्न ऑफशोअरचा सर्वात मोठा वाटा असून येथे एकूण उत्पादनापैकी 59 टक्के वायूचे उत्पादन होते.आसाम राज्यामध्ये 14 टक्के, गुजरातमध्ये 5 टक्के, तामिळनाडूमध्ये आणि राजस्थानात प्रत्येकी 4 टक्के उत्पादन होते.

नोएडा- भारतामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यांवरुन हे साठे भारताला पुढील 45 वर्षे पुरतील असे उत्तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी भारतात 2005 पासून देशात नैसर्गिक वायूचे किती उत्पादन झाले, त्यामध्ये कोणत्या राज्याचा किती वाटा आहे आणि हे साठे किती वर्षे पुरतील अशी माहिती विचारली होती. 2016-17 वर्षाच्या उत्पादनाची गती आणि 31 मार्च 2017 रोजी उपलब्ध असणाऱ्या साठ्यांचा विचार करता भारताला हे साठे पुढील 45 वर्षे पुरतील असे सारडा यांना मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे.

या उत्तरात 2004-05 या वर्षापासून नैसर्गिक वायू उत्पादनाची आरडेवारीही देण्यात आली आहे. 2004-05 या वर्षी भारतात 31.76 अब्ज क्युबिक मिटर्स नैसर्गिक वायूचे उत्पादन झाले. 2015-16 या वर्षी हे उत्पादन 32.25 अब्ज क्युबिक मिटर्स तर 2016-17 या वर्षी 31.90 अब्ज क्युबिक मिटर्स इतके उत्पादन झाले. या वर्षी म्हणजे 2017 साली ऑगस्ट महिन्यापर्यंत 13.69 अब्ज क्युबिक मिटर्स इतके नैसर्गिक वायूचे उत्पादन झालेले आहे.नैसर्गिक वायूच्या उत्पादनामध्ये वेस्टर्न ऑफशोअरचा सर्वात मोठा वाटा असून येथे एकूण उत्पादनापैकी 59 टक्के वायूचे उत्पादन होते. तर इस्टर्न ऑफशोअरवर 9 टक्के उत्पादन होते. आसाम राज्यामध्ये 14 टक्के, गुजरातमध्ये 5 टक्के, तामिळनाडूमध्ये आणि राजस्थानात प्रत्येकी 4 टक्के उत्पादन होते. इतर राज्यांमध्ये यापेक्षा कमी उत्पादन होते.नैसर्गिक वायूची दिवसेंदिवस वाढणारी गरज पाहता आणि तेलापेक्षा पर्यावरण पूरक म्हणून नैसर्गिक वायूला वाहनांमध्ये पसंती मिळत असताना नैसर्गिक वायूच्या उत्पादनाची गरज असल्याचे मत सारडा यांनी व्यक्त केले आहे. येणारी 100 वर्षांची गरज पूर्ण होईल इतक्या साठ्यांचा शोध व उत्पादन व्हावे अशी विनंती  प्रफु्ल्ल सारडा यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Indiaभारत