शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

भारताची क्षेपणास्त्र व्यवस्था विश्वासार्ह अन् सुरक्षेची प्रक्रियाही उच्च प्रकारची- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 10:05 IST

क्षेपणास्त्र अपघाताने डागले गेल्याची घटना ही खेदजनक असल्याचे ते म्हणाले. 

नवी दिल्ली : भारताची क्षेपणास्त्र व्यवस्था ही खूप विश्वासार्ह आणि सुरक्षेची प्रक्रियाही अतिशय उच्च प्रकारची असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत ठामपणे सांगितले. क्षेपणास्त्र अपघाताने डागले गेल्याची घटना ही खेदजनक असल्याचे ते म्हणाले. क्षेपणास्त्र हाताळण्याची प्रमाणित आणि त्याची देखभाल करण्याच्या पद्धतीचा आढावा घेतला जात  असून, काही दोष आढळल्यास ते तत्काळ दूर केले जातील, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. 

भारताची भूमिका अपूर्ण - कुरेशी

भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात डागले गेल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत मांडलेली भूमिका ही ‘अपूर्ण’ आहे, अशा शब्दांत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारताचे म्हणणे फेटाळले. त्या घटनेच्या संयुक्त चौकशीची मागणी कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा केली. मंत्री सिंह यांनी लोकसभेत जे सांगितले ते पाकिस्तानचे समाधान करणारे नाही, असे ते म्हणाले. क्षेपणास्त्र डागले जाणे हे कमालीचे बेजबाबदारपणाचे आहे.

अन्य कारण सूचित होत नाही - अमेरिका

भारतातून ९ मार्च रोजी पाकिस्तानात पडलेले क्षेपणास्त्र हे अपघाताशिवाय अन्य कोणत्याही कारणांनी होते असे सूचित होत नाही, असे अमेरिकेने म्हटले. भारताने शुक्रवारी म्हटले की, “भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात अपघाताने पडले आणि त्याबद्दल तीव्र खेद होतोय. ती घटना तांत्रिक दोषामुळे घडली.” अपघाताशिवाय दुसऱ्या काेणत्याही कारणाने तो प्रकार घडलेला नाही हे भारतानेही म्हटले आहे. आमच्याकडे त्याशिवाय दुसरे काही सूचित करणारे नाही. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तान