शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘इंडिया’ची शेतकऱ्यांना एमएसपीची गॅरंटी; राहुल गांधी यांनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 10:27 IST

निदर्शक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याच्या अनुषंगाने राहुल यांनी सरकारवर टीका केली.

अंबिकापूर : आगामी लोकसभा निवडणुकांत इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यास किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) कायदेशीर हमी देण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. देशातील हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा इंडिया आघाडीच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

भारत जोडो यात्रेदरम्यान  अंबिकापूर येथे जाहीर सभेत राहुल गांधी यांनी सांगितले की, सध्या निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी सरकार अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आहे. विविध मागण्या करणारे निदर्शक तसेच दिल्ली चलो आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. विद्यमान केंद्र सरकारने जीएसटी व नोटाबंदी यांचा वापर देशातील व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त होण्यासाठी केला आहे. निदर्शक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याच्या अनुषंगाने राहुल यांनी सरकारवर टीका केली.

योग्य भाव मिळावा...‘दिल्ली चलो’ आंदोलनाचे नेतृत्व करणारा संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा या संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पिकांसाठी किमान आधारभूत किंमत आणि कर्जमाफीचा कायदा या प्रमुख मागण्या आहेत. राहुल गांधी यांनी सांगितले की, कृषिमालाला योग्य भाव मिळावा यासाठी हे शेतकरी आंदोलन करत आहेत. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना विद्यमान केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला; पण स्वामीनाथन समितीने केलेल्या शिफारसी लागू करण्यास हे सरकार तयार नाही. 

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी इंडिया आघाडी सक्रियकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले की, किमान आधारभूत किंमत मिळण्याचा कायदेशीर हक्क शेतकऱ्यांना प्राप्त झाला पाहिजे, असे डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यास डॉ. स्वामीनाथन समितीच्या सर्व शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल. इंडिया आघाडी नेहमी शेतकरी व सामान्य माणसांच्या कल्याणासाठीच काम करत राहाणार आहे. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस