शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारताचा चीनवर ‘इलेक्ट्रॉनिक स्ट्राइक’; विदेशी लॅपटाॅप, काॅम्प्युटर महागणार; ...म्हणून उचललं पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:40 IST

...तसेच चीनसारख्या देशांतून होणारी आयात कमी करणे, हाही एक उद्देश त्यामागे आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅबलेट, ऑल-इन-वन वैयक्तिक संगणक, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर (यूएसएफएफ) संगणक आणि सर्व्हर यांच्या आयातीवर बंधने (रिस्ट्रिक्शन्स) घातली आहेत. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, या उत्पादनांच्या आयातीसाठी आता परवाना किंवा सरकारच्या मंजुरीची गरज लागेल. देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच चीनसारख्या देशांतून होणारी आयात कमी करणे, हाही एक उद्देश त्यामागे आहे. 

विदेश व्यापार महासंचालनालयाने गुरुवारी अधिसूचना जारी केली. त्यात म्हटले की, संशोधन व विकास, परीक्षण, बेंचमार्किंग, मूल्यांकन, देखभाल व उत्पादन विकास या उद्देशाने प्रति खेप २० वस्तूंच्या आयातीला परवान्याची गरज नसेल. 

कोणाच्या किमती वाढणार? - ॲपलसह विविध कंपन्यांच्या लॅपटॉपची आयातही बंद होणार आहे. - देशात विकले जाणारे बहुतांश लॅपटॉप हे चीन, कोरियामध्ये तयार होतात. डेल, एचपी, एसर, लिनोव्हो आदी कंपन्यांचे भारतात प्रकल्प असल्याने त्यांच्या निर्मितीला देशात प्रोत्साहन मिळेल. - ॲपलचा भारतात प्रकल्प नसल्याने या कंपनीच्या उत्पादनांचा देशात तुटवडा जाणवू शकतो. ते महाग होऊ शकतात. 

वैध परवाना, तरच परवानगीमायक्रोकॉम्प्युटर, मोठे संगणक आणि काही डेटा प्रोसेसिंग यंत्रे यांनाही आयात अंकुश श्रेणीत टाकले आहे. काम झाल्यानंतरही आयात केलेले संगणक विकता येणार नाहीत. 

देशी उत्पादनांना चालनारिलायन्सने ‘जिओबुक’ स्वदेशी लॅपटॉप लॉन्च केला. मध्यंतरी टाटाने आयफोन निर्मिती करणारा प्रकल्प अधिग्रहित केला. तेथे आयफोनची असेंब्ली केली जाणार होती. केंद्राच्या निर्णयानंतर तिथे ॲपलचे अन्य उत्पादनेही तयार केल्यास ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळेल. 

केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅबलेट तसेच संगणकाच्या आयातीवर निर्बंध  घातल्यानंतर देशात त्यांच्या निर्मितीला चालना मिळेल.  - अली अख्तर जाफरी, महासंचालक, मैत

टॅग्स :laptopलॅपटॉपchinaचीनIndiaभारत