शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भारतीयांची नोकरी, नागरिकत्व जाणार नाही; ‘सीएए’वरुन सरकारची विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 05:33 IST

सीएएमुळे कोणाही भारतीयाचे नागरिकत्व किंवा त्याची नोकरी जाण्याची शक्यता नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल (सीएए) विरोधक खोटी माहिती पसरवून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. सीएए लागू केल्यानंतर देशभरात विरोधकांनी या कायद्याविरोधात रान उठविले आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, सीएएमुळे कोणाही भारतीयाचे नागरिकत्व किंवा त्याची नोकरी जाण्याची शक्यता नाही. 

रविशंकर प्रसाद म्हणाले की, तीन शेजारी देशांत धार्मिक छळ झाल्यामुळे तेथील जे अल्पसंख्याक भारतात स्थलांतरित झाले त्यांच्यासाठी सीएए कायदा करण्यात आला आहे. अपप्रचार करून विरोधी पक्ष जातीय भावना भडकावत आहेत. 

मतांसाठी राजकारण : अरविंद केजरीवाल

लोकसभा निवडणुकांच्या आधी सीएए कायदा लागू करणे हे भाजपने मतपेढीसाठी केलेले घाणेरडे राजकारण आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ते म्हणाले की, हा कायदा रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे. 

...म्हणून आमचा विरोध : ममता बॅनर्जी

सीएए हा कायदा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सशी (एनआरसी) जोडलेला आहे. त्यामुळेच मी या कायद्याला विरोध करत आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले. त्या म्हणाल्या की, आसाममध्ये आहेत तसे डिटेन्शन कॅम्प आम्ही पश्चिम बंगालमध्ये उघडू देणार नाही.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४