शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भारतीयांची नोकरी, नागरिकत्व जाणार नाही; ‘सीएए’वरुन सरकारची विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 05:33 IST

सीएएमुळे कोणाही भारतीयाचे नागरिकत्व किंवा त्याची नोकरी जाण्याची शक्यता नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल (सीएए) विरोधक खोटी माहिती पसरवून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. सीएए लागू केल्यानंतर देशभरात विरोधकांनी या कायद्याविरोधात रान उठविले आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, सीएएमुळे कोणाही भारतीयाचे नागरिकत्व किंवा त्याची नोकरी जाण्याची शक्यता नाही. 

रविशंकर प्रसाद म्हणाले की, तीन शेजारी देशांत धार्मिक छळ झाल्यामुळे तेथील जे अल्पसंख्याक भारतात स्थलांतरित झाले त्यांच्यासाठी सीएए कायदा करण्यात आला आहे. अपप्रचार करून विरोधी पक्ष जातीय भावना भडकावत आहेत. 

मतांसाठी राजकारण : अरविंद केजरीवाल

लोकसभा निवडणुकांच्या आधी सीएए कायदा लागू करणे हे भाजपने मतपेढीसाठी केलेले घाणेरडे राजकारण आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ते म्हणाले की, हा कायदा रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे. 

...म्हणून आमचा विरोध : ममता बॅनर्जी

सीएए हा कायदा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सशी (एनआरसी) जोडलेला आहे. त्यामुळेच मी या कायद्याला विरोध करत आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले. त्या म्हणाल्या की, आसाममध्ये आहेत तसे डिटेन्शन कॅम्प आम्ही पश्चिम बंगालमध्ये उघडू देणार नाही.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४