शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

'भारतीयांनी 'कोरोना'ला घाबरण्याची गरज नाही; आपण त्यावर विजय मिळवतोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 10:56 IST

कोरोनामुळे तीन हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे. तर 90 हजार लोक या व्हायरसने त्रस्त आहे. त्याचवेळी 53 हजार लोक या आजारातून बरे झाल्याकडे गगनदीप यांनी लक्ष वेधले. 

नवी दिल्ली - जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे मागील दोन तीन दिवसांपासून भारतात देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भारतातकोरोनाग्रस्त पाच पैकी एक रुग्ण स्वत:च ठीक होत आहे. हे पाहता भारतीयांनी कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नसल्याचे भारतीय शास्त्रज्ञ गगनदीप कांग यांनी म्हटले आहे.

गगनदीप कांग म्हणाल्या की, कोरोना व्हायरसचे 30 रुग्ण आढळले आहे. यामध्ये इटलीच्या 16 रुग्णांचा समावेश आहे. तर केरळमधील तीन रुग्ण आहेत. मात्र हे तिन्ही रुग्ण पूर्णपणे ठीक झाले आहेत. गेल्या वर्षी लंडनमधील रॉयल सोसायटीमध्ये फेलो म्हणून निवडण्यात आलेल्या पहिल्या भारतीय महिला गगनदीप यांनी सरकारी दवाखान्यांकडून लोकांमध्ये जागरुकता करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णापासून दूर राहण्यासाठीची आवश्यक खबरदारी लोकांना घेण्याचे आवाहन सरकार दवाखान्यांनी करावे, अस त्यांनी सांगितले.

काळजी घेणे कोरोनावर पक्का उपाय नाही. मात्र काळजी घेणे आपल्यासाठी उपयोगी पडू शकते. कोरोना व्हायरसचे 5 पैकी चार रुग्ण आपोआप ठीक होतात. कोरोनाच्या रुग्णांना केवळ पॅरासिटोमॉल पुरेशा असतात. तर पाचपैकी एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते, असं गगनदीप यांनी सांगितले. तसेच श्वास घेताना अडचण आल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे गगनदीप यांनी सांगितले.

कोरोनाविषयी फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही दररोज व्हायरसच्या संपर्कात येतो. केवळ आपले हात स्वच्छ धुवून घ्यावे. फर्चीवर किटकनाशक टाकवे.  तसेच चेहऱ्याला वारंवार हात लावू नये, असंही गगनदीप यांनी सांगितले. दरम्यान कोरोनामुळे तीन हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे. तर 90 हजार लोक या व्हायरसने त्रस्त आहे. त्याचवेळी 53 हजार लोक या आजारातून बरे झाल्याकडे गगनदीप यांनी लक्ष वेधले.