शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

'भारतीयांनी 'कोरोना'ला घाबरण्याची गरज नाही; आपण त्यावर विजय मिळवतोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 10:56 IST

कोरोनामुळे तीन हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे. तर 90 हजार लोक या व्हायरसने त्रस्त आहे. त्याचवेळी 53 हजार लोक या आजारातून बरे झाल्याकडे गगनदीप यांनी लक्ष वेधले. 

नवी दिल्ली - जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे मागील दोन तीन दिवसांपासून भारतात देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भारतातकोरोनाग्रस्त पाच पैकी एक रुग्ण स्वत:च ठीक होत आहे. हे पाहता भारतीयांनी कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नसल्याचे भारतीय शास्त्रज्ञ गगनदीप कांग यांनी म्हटले आहे.

गगनदीप कांग म्हणाल्या की, कोरोना व्हायरसचे 30 रुग्ण आढळले आहे. यामध्ये इटलीच्या 16 रुग्णांचा समावेश आहे. तर केरळमधील तीन रुग्ण आहेत. मात्र हे तिन्ही रुग्ण पूर्णपणे ठीक झाले आहेत. गेल्या वर्षी लंडनमधील रॉयल सोसायटीमध्ये फेलो म्हणून निवडण्यात आलेल्या पहिल्या भारतीय महिला गगनदीप यांनी सरकारी दवाखान्यांकडून लोकांमध्ये जागरुकता करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णापासून दूर राहण्यासाठीची आवश्यक खबरदारी लोकांना घेण्याचे आवाहन सरकार दवाखान्यांनी करावे, अस त्यांनी सांगितले.

काळजी घेणे कोरोनावर पक्का उपाय नाही. मात्र काळजी घेणे आपल्यासाठी उपयोगी पडू शकते. कोरोना व्हायरसचे 5 पैकी चार रुग्ण आपोआप ठीक होतात. कोरोनाच्या रुग्णांना केवळ पॅरासिटोमॉल पुरेशा असतात. तर पाचपैकी एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते, असं गगनदीप यांनी सांगितले. तसेच श्वास घेताना अडचण आल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे गगनदीप यांनी सांगितले.

कोरोनाविषयी फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही दररोज व्हायरसच्या संपर्कात येतो. केवळ आपले हात स्वच्छ धुवून घ्यावे. फर्चीवर किटकनाशक टाकवे.  तसेच चेहऱ्याला वारंवार हात लावू नये, असंही गगनदीप यांनी सांगितले. दरम्यान कोरोनामुळे तीन हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे. तर 90 हजार लोक या व्हायरसने त्रस्त आहे. त्याचवेळी 53 हजार लोक या आजारातून बरे झाल्याकडे गगनदीप यांनी लक्ष वेधले.