शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भारतीय रेल्वे प्रत्येकाला कन्फर्म तिकीट देणार, वेळ मर्यादाही निश्चित, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 20:34 IST

भारतीय रेल्वेत कन्फर्म तिकीट वेळेत मिळत नाही, त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो.

आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण, सध्या अनेकांना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो. यावर आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय रेल्वे सर्व प्रवाशांना कन्फर्म तिकीट देण्याची तयारी करत आहे.आता तिकीटासाठी तुम्हाला जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. रेल्वेने कालमर्यादा निश्चित केली आहे. या कालमर्यादेनंतर, ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी त्यांच्या संबंधित सीटवर बसून किंवा झोपून प्रवास करु शकतात.

टीका करणारी शेहला रशीद अचानकच कशी बनली मोदींची फॅन? स्वत: तिनंच सांगितलं, हा आहे टर्निंग पॉइंट

सध्या वर्षाला ८०० कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करत आहेत. त्यासाठी मेल, पॅसेंजर, उपनगरीय आणि प्रवासी अशा १०७४८ गाड्या चालवल्या जात आहेत. या ८०० कोटी प्रवाशांपैकी प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळत नाही. यातील अनेकांना वेटिंग तिकिटांवर प्रवास करावा लागतो, जे खूपच गैरसोयीचे आहे. २०२७ पर्यंत प्रत्येकाला कन्फर्म तिकीट देण्याची रेल्वेची योजना आहे. त्या दिशेने कामही सुरू झाले आहे.

दरवर्षी १००० कोटी प्रवाशांना प्रवास करण्याची रेल्वेची योजना आहे. यासाठी ३००० अतिरिक्त गाड्या चालवल्या जातील, जेणेकरून प्रत्येकाला कन्फर्म तिकीट देता येईल. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वे ट्रॅकची क्षमता वाढवण्यासाठी आणि गाड्या वाढवण्याच्या दिशेने सतत काम करत आहे. प्रत्येकाला सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देणे हे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

सात महिन्यांत ३९० कोटींचा प्रवास 

एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एकूण ३९०.२० कोटी प्रवाशांनी सर्व ट्रेनमधून प्रवास केला. यातील बहुसंख्य नॉन-एसी म्हणजेच स्लीपर आणि सामान्य वर्गातील प्रवासी होते. ३७२ कोटी प्रवाशांनी नॉन एसी मध्ये प्रवास केला. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी हे प्रमाण ९५.३ टक्के आहे. एकूण प्रवाशांपैकी १८.२ कोटी प्रवाशांनी एसी क्लासमधून प्रवास केला. रेल्वेच्या सर्व वर्गांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या तुलनेत हे प्रमाण फक्त ४.७ टक्के आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे