शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रेल्वे प्रत्येकाला कन्फर्म तिकीट देणार, वेळ मर्यादाही निश्चित, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 20:34 IST

भारतीय रेल्वेत कन्फर्म तिकीट वेळेत मिळत नाही, त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो.

आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण, सध्या अनेकांना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो. यावर आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय रेल्वे सर्व प्रवाशांना कन्फर्म तिकीट देण्याची तयारी करत आहे.आता तिकीटासाठी तुम्हाला जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. रेल्वेने कालमर्यादा निश्चित केली आहे. या कालमर्यादेनंतर, ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी त्यांच्या संबंधित सीटवर बसून किंवा झोपून प्रवास करु शकतात.

टीका करणारी शेहला रशीद अचानकच कशी बनली मोदींची फॅन? स्वत: तिनंच सांगितलं, हा आहे टर्निंग पॉइंट

सध्या वर्षाला ८०० कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करत आहेत. त्यासाठी मेल, पॅसेंजर, उपनगरीय आणि प्रवासी अशा १०७४८ गाड्या चालवल्या जात आहेत. या ८०० कोटी प्रवाशांपैकी प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळत नाही. यातील अनेकांना वेटिंग तिकिटांवर प्रवास करावा लागतो, जे खूपच गैरसोयीचे आहे. २०२७ पर्यंत प्रत्येकाला कन्फर्म तिकीट देण्याची रेल्वेची योजना आहे. त्या दिशेने कामही सुरू झाले आहे.

दरवर्षी १००० कोटी प्रवाशांना प्रवास करण्याची रेल्वेची योजना आहे. यासाठी ३००० अतिरिक्त गाड्या चालवल्या जातील, जेणेकरून प्रत्येकाला कन्फर्म तिकीट देता येईल. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वे ट्रॅकची क्षमता वाढवण्यासाठी आणि गाड्या वाढवण्याच्या दिशेने सतत काम करत आहे. प्रत्येकाला सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देणे हे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

सात महिन्यांत ३९० कोटींचा प्रवास 

एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एकूण ३९०.२० कोटी प्रवाशांनी सर्व ट्रेनमधून प्रवास केला. यातील बहुसंख्य नॉन-एसी म्हणजेच स्लीपर आणि सामान्य वर्गातील प्रवासी होते. ३७२ कोटी प्रवाशांनी नॉन एसी मध्ये प्रवास केला. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी हे प्रमाण ९५.३ टक्के आहे. एकूण प्रवाशांपैकी १८.२ कोटी प्रवाशांनी एसी क्लासमधून प्रवास केला. रेल्वेच्या सर्व वर्गांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या तुलनेत हे प्रमाण फक्त ४.७ टक्के आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे