शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

CoronaVirus News : आजपासून पॅसेंजर ट्रेनसाठी बुकिंग सुरू; पण, यासाठी काय करावं लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 13:19 IST

CoronaVirus News : या ट्रेन नवी दिल्लीतून देशातील १५ विविध शहरांपर्यंत धावणार आहेत.

ठळक मुद्दे१२ मे पासून धावणाऱ्या या ट्रेनचे तिकिट बुकिंग केवळ ऑनलाइन माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी रेल्वे तिकिट एजंट आणि स्टेशन खिडकीतून तिकिट उपलब्ध होणार नाही. याशिवाय, तत्काळ व प्रीमियम तत्काळचीही सुविधा दिली नाही आणि करेंट तिकिटाचीही सोय नसणार आहे. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने १२ मेपासून स्पेशल पॅसेंजर ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. या ट्रेन नवी दिल्लीतून देशातील १५ विविध शहरांपर्यंत धावणार आहेत. या पॅसेंजर ट्रेनसाठी प्रवाशांना ११ मे रोजी दुपारी ४ वाजल्यापासून बुकिंग सुरू होईल. मात्र, रेल्वे स्टेशनच्या तिकिट काऊंटरद्वारे या तिकिटांचे बुकिंग केले जाणार नाही. 

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १२ मे पासून धावणाऱ्या या ट्रेनचे तिकिट बुकिंग केवळ ऑनलाइन माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी रेल्वे तिकिट एजंट आणि स्टेशन खिडकीतून तिकिट उपलब्ध होणार नाही. तसेच, प्लॅटफॉर्मची तिकिटे मिळणार नाहीत. याशिवाय, तत्काळ व प्रीमियम तत्काळचीही सुविधा दिली नाही आणि करेंट तिकिटाचीही सोय नसणार आहे. 

ट्रेनचे तिकीट कोठे मिळणार?भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, प्रवासी या ट्रेनचे https://www.irctc.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आज दुपारी 4 वाजल्यापासून तिकिटे बुक करू शकतात. तसेच, ही सुविधा रेल्वे अॅपवरही उपलब्ध होणार आहे. म्हणजेच प्रवासी आयआरसीटीसी अॅपद्वारे तिकिटेही बुक करू शकतील. ट्रेनच्या एका कोचमध्ये ७२ सीट्स असतात, या सर्व सीट्सचे बुकिंग होणार आहे. 

कोण प्रवास करू शकेल?फक्त कंफर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच या ट्रेनमध्ये प्रवेश मिळणार आहे. प्रवासासाठी प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या वेळेच्या एक तासाच्या आधी स्टेशनवर पोहोचावे लागणार आहे. तसेच, प्रवाशांना मास्क लावणं बंधनकारक असणार आहे.

स्टेशनवर प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईलस्टेशनवर प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर प्रवासी पूर्णपणे निरोगी आढळल्यास प्रवासासाठी त्याला परवानगी दिली जाईल. प्रवासादरम्यान ट्रेन कमीत कमी स्टेशनवर थांबेल. या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे ब्लँकेट, बेडशीट व टॉवेल इत्यादी दिले जाणार नाही.

ट्रेनचे भाडे किती असेल?ट्रेनचे सर्व कोच एसी असतील आणि त्यांचे भाडेही राजधानी ट्रेनसारखेच असणार आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन लागू आहे. त्यामुळे देशातील सर्व पॅसेंजर ट्रेन सेवा 25 मार्चपासून बंद आहे.

कुठून-कुठे धावणार?या विशेष ट्रेन नवी दिल्लीतून दिब्रूगढ, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या शहरांमध्ये धावणार आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या