शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फ्लेक्सी फेअर योजना फसली; 40 ट्रेनची तिकिटे मिळणार सामान्य दरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 16:01 IST

रेल्वेने मागणीनुसार भाडे बदलणारी प्रणाली लागू केली होती. मात्र, प्रवासांना ही तिकिटे विमानापेक्षाही महाग मिळत होती.

नवी दिल्ली : रेल्वेने दोन वर्षांपूर्वी सुरु केलेली फ्लेक्सी फेअर योजना पुरती फसल्याने आता ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना नेहमीच्या दरातच 40 ट्रेनची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. 

रेल्वेने मागणीनुसार भाडे बदलणारी प्रणाली लागू केली होती. मात्र, प्रवासांना ही तिकिटे विमानापेक्षाही महाग मिळत होती. 9 सप्टेंबर 2016 ला रेल्वेने 44 राजधानी, 46 शताब्दी आणि 52 दुरांतो एक्स्प्रेसमध्ये ही प्रणाली सुरु केली होती. यानुसार प्रवाशांना एकून तिकिटांच्या केवळ 10 टक्के तिकिटेच सामान्य दराने मिळत होत. बाकी 90 टक्के तिकिटे ही मागणीनुसार भाडे कमी-जास्त होणाऱ्या प्रणालीवर विकली जात होती.

सुरवातीची 10 टक्के तिकिटे विकली गेल्यानंतरच्या 10 टक्के तिकिटांचा दर हा सामान्य तिकिटांपेक्षा 10 टक्के जास्त आकारला जात होता. ही वाढ जास्तीतजास्त 50 टक्क्यांपर्यंत होत होती. म्हणजेच शेवटच्या 10 टक्के तिकिटांचा दर दीड पट वाढत होता. ही प्रणाली लागू असलेल्या ट्रेनपैकी 50 टक्के रिकाम्या जात असलेल्या ट्रेन या प्रणालीपासून मुक्त करण्यात येणार आहेत. अशा 40 ट्रेन आहेत. तर उर्वरित 102 ट्रेनमध्ये तिकिटांची विक्री वाढविण्यासाठी रेल्वे 'अखेरचे मिनिट' ही योजना आणणार आहे. या योजनेंतर्गत ज्या ट्रेनमध्ये 60 टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण होत असेल त्या ट्रेनमध्ये चार दिवस आधीपर्यंत तिकिट आरक्षित केल्यास 50 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. 

फ्लेक्सी फेअर योजनेविरोधात प्रवाशांकडून वाढत्या तक्रारी पाहून रेल्वेने डिसेंबरमध्ये चौकशी समिती नेमली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेFairजत्राticketतिकिट