शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:50 IST

Indian Railway New Rules: प्रवाशांकडे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल तर, दंड भरावा लागणार आहे.

विमानाप्रमाणेच आता रेल्वे प्रवासातही सामानाचे वजन तपासले जाणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी सामानाचे वजन नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला असून, काही प्रमुख स्थानकांवर या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे अतिरिक्त सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड भरावा लागू शकतो.

रेल्वेच्या नियमानुसार, प्रत्येक श्रेणीसाठी मोफत सामान वाहून नेण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

श्रेणीवजन मर्यादा
प्रथम श्रेणी७० किलो
एसी सेकंड क्लास५० किलो
थर्ड एसी आणि स्लीपर४० किलो
जनरल३५ किलो

मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास...प्रवाशांकडे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल आणि त्यांनी ते बुक केले नसेल, तर त्यांना दंड भरावा लागेल. रेल्वे प्रवाशांना त्यांच्यासोबत १० किलोपर्यंत अतिरिक्त सामान घेऊन जाण्याची परवानगी असेल, परंतु त्यापेक्षा जास्त वजनासाठी सामान बुक करणे आवश्यक आहे.

रेल्वे अधिकाऱ्याचे स्पष्टीकरणरेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी जास्त सामान घेऊन प्रवास करतात, ज्यामुळे रेल्वेच्या डब्यात बसताना आणि चालताना अडथळे निर्माण होतात. यामुळे प्रवाशांना आणि इतरांची गैरसोय होते. तसेच, अतिरिक्त सामान सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकते.

रेल्वे स्थानकांवरही सामान बुक करण्याची सुविधासध्या उत्तर रेल्वे आणि उत्तर मध्य रेल्वेने लखनौ आणि प्रयागराज विभागातील प्रमुख स्थानकांवरून ही नवीन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात प्रयागराज, मिर्झापूर, कानपूर, अलीगढ जंक्शन यांसारख्या मोठ्या स्थानकांचा समावेश आहे. विमानतळांप्रमाणेच, रेल्वे स्थानकांवरही सामान बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या सामानाचे वजन तपासून घेणे महत्त्वाचे असेल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे