शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आता रेल्वे अपघातग्रस्तांना १० पट अधिक नुकसान भरपाई मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 09:27 IST

सुधारित सानुग्रह अनुदानाची रक्कम १८ सप्टेंबरपासून लागू केली जाईल.

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेअपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आता रेल्वे अपघातात एखाद्या प्रवाशाला जीव गमवावा लागल्यास किंवा प्रवाशी जखमी झाल्यास त्याला पूर्वीपेक्षा १० पट अधिक नुकसान भरपाई मिळणार आहे. दरम्यान, याआधी २०१२ आणि २०१३ मध्ये रेल्वेने सानुग्रह अनुदानाच्या निधीमध्ये शेवटची सुधारणा केली होती.

पीटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वेने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, रेल्वे अपघात आणि अनुचित घटनांमध्ये प्राण गमावलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या निधीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच रेल्वेच्या प्रथमदर्शनी दायित्वामुळे मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंगवर अपघात झालेल्यांनाही अधिक भरपाई मिळणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सुधारित सानुग्रह अनुदानाची रक्कम १८ सप्टेंबरपासून लागू केली जाईल.

किती रुपये मिळतील?रेल्वे आणि मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना आता ५० हजार रुपयांऐवजी ५ लाख रुपये, तर गंभीर जखमींना २५ हजार रुपयांऐवजी २.५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना ५ हजार रुपयांऐवजी ५० हजार रुपये मिळणार आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही अनुचित घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना, गंभीर जखमी आणि मध्यम जखमी प्रवाशांना अनुक्रमे १.५ लाख रुपये, ५० हजार रुपये आणि ५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल. 

इतर सुविधा...याचबरोबर, रेल्वेने म्हटले आहे की, रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना ३० दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल केल्यास त्यांना अतिरिक्त भरपाई मिळेल. तसेच, जखमी प्रवाशांना प्रत्येक १० दिवसांच्या कालावधीच्या शेवटी किंवा डिस्चार्जच्या तारखेला, यापैकी जे आधी असेल त्यांना दररोज ३ हजार रुपये दिले जातील. दरम्यान, रेल्वे कायदा १९८९ नुसार अपघात आणि अनुचित घटनांमध्ये प्रवाशांचा मृत्यू किंवा दुखापत झाल्यास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेAccidentअपघात