शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना सवलत न देता कमावले १५०० कोटी रुपये; पुन्हा सवलती देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 06:05 IST

रेल्वेने कोरोना कालावधीत मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रेल्वेने कोरोना महामारीच्या कालावधीत मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे रेल्वेने १५०० रुपये कमावले. आरटीआयमधून ही माहिती उपलब्ध झाली आहे; परंतु आता या सवलती पुन्हा सुरू करण्याची मागणी होतआहे.

मध्य प्रदेशचे चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या माहितीचा अधिकार (आरटीआय) अर्जाच्या उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे. रेल्वेने सांगितले आहे की, २० मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ दरम्यान रेल्वेकडून ७.३१ कोटी ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्यात आल्या नाहीत. यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ४.४६ कोटी पुरुष, ५८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला व ८,३१० ट्रान्सजेंडरचा समावेश आहे.

आरटीआयमध्ये मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे की, या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांकडून एकूण ३,४६४ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. यात सवलत बंद झाल्यामुळे मिळालेल्या १,५०० कोटी रुपयांचा समावेश आहे. 

ट्रान्सजेंडर प्रवाशांकडून ४५.५८ लाखांची कमाई

पुरुष प्रवाशांकडून २०८२ कोटी रुपये, महिला प्रवाशांकडून १३८१ कोटी व ट्रान्सजेंडरकडून ४५.५८ लाख रुपयांचा महसूल कमावला. महिला ज्येष्ठ नागरिक प्रवासी ५० टक्के, तर पुरुष व ट्रान्सजेंडरना ४० टक्के सूट दिली जाते.

सवलती सोडण्यासाठी केले होते प्रोत्साहित

- रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींमुळे रेल्वेला दरवर्षी सुमारे २००० कोटी रुपयांचा बोजा पडतो. ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत एकूण सवलतीच्या सुमारे ८० टक्के आहे. 

- यापूर्वी रेल्वेने ज्येष्ठांना सवलती सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु रेल्वेचा हा प्रयत्न अयशस्वी राहिला. ‘कॅग’च्या २०१९च्या अहवालानुसार, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या योजनेला फार उत्साहजनक प्रतिसाद मिळाला नाही.

पुन्हा सवलती देण्याची मागणी

मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटांवर मिळणारी सवलत बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय अद्याप कायम आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतांनुसार ज्येष्ठांना मिळणाऱ्या सवलती कायम ठेवल्या जाऊ शकत नाहीत. कोरोनामुळे २०२० ते २१ पर्यंत रेल्वेसेवा बंद होत्या; परंतु आता लोकांचे जनजीवन पुन्हा पूर्ववत होत असताना रेल्वेसेवा रुळांवर येत आहे. अशा स्थितीत सवलती बहाल करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे