शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना सवलत न देता कमावले १५०० कोटी रुपये; पुन्हा सवलती देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 06:05 IST

रेल्वेने कोरोना कालावधीत मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रेल्वेने कोरोना महामारीच्या कालावधीत मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे रेल्वेने १५०० रुपये कमावले. आरटीआयमधून ही माहिती उपलब्ध झाली आहे; परंतु आता या सवलती पुन्हा सुरू करण्याची मागणी होतआहे.

मध्य प्रदेशचे चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या माहितीचा अधिकार (आरटीआय) अर्जाच्या उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे. रेल्वेने सांगितले आहे की, २० मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ दरम्यान रेल्वेकडून ७.३१ कोटी ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्यात आल्या नाहीत. यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ४.४६ कोटी पुरुष, ५८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला व ८,३१० ट्रान्सजेंडरचा समावेश आहे.

आरटीआयमध्ये मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे की, या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांकडून एकूण ३,४६४ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. यात सवलत बंद झाल्यामुळे मिळालेल्या १,५०० कोटी रुपयांचा समावेश आहे. 

ट्रान्सजेंडर प्रवाशांकडून ४५.५८ लाखांची कमाई

पुरुष प्रवाशांकडून २०८२ कोटी रुपये, महिला प्रवाशांकडून १३८१ कोटी व ट्रान्सजेंडरकडून ४५.५८ लाख रुपयांचा महसूल कमावला. महिला ज्येष्ठ नागरिक प्रवासी ५० टक्के, तर पुरुष व ट्रान्सजेंडरना ४० टक्के सूट दिली जाते.

सवलती सोडण्यासाठी केले होते प्रोत्साहित

- रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींमुळे रेल्वेला दरवर्षी सुमारे २००० कोटी रुपयांचा बोजा पडतो. ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत एकूण सवलतीच्या सुमारे ८० टक्के आहे. 

- यापूर्वी रेल्वेने ज्येष्ठांना सवलती सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु रेल्वेचा हा प्रयत्न अयशस्वी राहिला. ‘कॅग’च्या २०१९च्या अहवालानुसार, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या योजनेला फार उत्साहजनक प्रतिसाद मिळाला नाही.

पुन्हा सवलती देण्याची मागणी

मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटांवर मिळणारी सवलत बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय अद्याप कायम आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतांनुसार ज्येष्ठांना मिळणाऱ्या सवलती कायम ठेवल्या जाऊ शकत नाहीत. कोरोनामुळे २०२० ते २१ पर्यंत रेल्वेसेवा बंद होत्या; परंतु आता लोकांचे जनजीवन पुन्हा पूर्ववत होत असताना रेल्वेसेवा रुळांवर येत आहे. अशा स्थितीत सवलती बहाल करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे