शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना सवलत न देता कमावले १५०० कोटी रुपये; पुन्हा सवलती देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 06:05 IST

रेल्वेने कोरोना कालावधीत मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रेल्वेने कोरोना महामारीच्या कालावधीत मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे रेल्वेने १५०० रुपये कमावले. आरटीआयमधून ही माहिती उपलब्ध झाली आहे; परंतु आता या सवलती पुन्हा सुरू करण्याची मागणी होतआहे.

मध्य प्रदेशचे चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या माहितीचा अधिकार (आरटीआय) अर्जाच्या उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे. रेल्वेने सांगितले आहे की, २० मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ दरम्यान रेल्वेकडून ७.३१ कोटी ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्यात आल्या नाहीत. यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ४.४६ कोटी पुरुष, ५८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला व ८,३१० ट्रान्सजेंडरचा समावेश आहे.

आरटीआयमध्ये मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे की, या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांकडून एकूण ३,४६४ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. यात सवलत बंद झाल्यामुळे मिळालेल्या १,५०० कोटी रुपयांचा समावेश आहे. 

ट्रान्सजेंडर प्रवाशांकडून ४५.५८ लाखांची कमाई

पुरुष प्रवाशांकडून २०८२ कोटी रुपये, महिला प्रवाशांकडून १३८१ कोटी व ट्रान्सजेंडरकडून ४५.५८ लाख रुपयांचा महसूल कमावला. महिला ज्येष्ठ नागरिक प्रवासी ५० टक्के, तर पुरुष व ट्रान्सजेंडरना ४० टक्के सूट दिली जाते.

सवलती सोडण्यासाठी केले होते प्रोत्साहित

- रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींमुळे रेल्वेला दरवर्षी सुमारे २००० कोटी रुपयांचा बोजा पडतो. ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत एकूण सवलतीच्या सुमारे ८० टक्के आहे. 

- यापूर्वी रेल्वेने ज्येष्ठांना सवलती सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु रेल्वेचा हा प्रयत्न अयशस्वी राहिला. ‘कॅग’च्या २०१९च्या अहवालानुसार, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या योजनेला फार उत्साहजनक प्रतिसाद मिळाला नाही.

पुन्हा सवलती देण्याची मागणी

मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटांवर मिळणारी सवलत बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय अद्याप कायम आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतांनुसार ज्येष्ठांना मिळणाऱ्या सवलती कायम ठेवल्या जाऊ शकत नाहीत. कोरोनामुळे २०२० ते २१ पर्यंत रेल्वेसेवा बंद होत्या; परंतु आता लोकांचे जनजीवन पुन्हा पूर्ववत होत असताना रेल्वेसेवा रुळांवर येत आहे. अशा स्थितीत सवलती बहाल करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे