शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भारतीय रेल्वेने ट्रेनमध्येच तयार केले 'आयसोलेशन कोच', देशातील रुग्णांचा आकडा 902वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 14:45 IST

रेल्वेने पूर्णपणे रुग्णाच्या दृष्टीकोनातून हे बर्थ तयार केले आहेत. आयसोलेशन कोच तयार करण्यासाठी बाथरूम, जाण्यायेण्याचा रस्ता आणि इतर भागही व्यवस्थितपणे तयार करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा सामना करण्यासाठी भारतासह सर्वच देश युद्धपातळीवर करतायेत तयारीगरज भासल्यास, असे तीन लाख आयसोलेशन कोच तयार करता येणे शक्यजगभरात तब्बल 5,97,458 जणांना कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतीयरेल्वेने आयसोलेशन कोच तयार केले आहेत. बोगीचे आयसोलेशन वार्डमध्ये रुपांतर करताना रेल्वेने मध्यभागी असलेला बर्थ काढून टाकला आहे. तसेच रुग्णाची व्यवस्था ज्या बर्थवर असेल त्या बर्थ समोरील तिनही बर्थ काढले आहेत. देशातील कोरोना बाधितांचा आकडा आता  902 वर पोहोचली आहे.

रेल्वेने पूर्णपणे रुग्णाच्या दृष्टीकोनातून हे बर्थ तयार केले आहेत. आयसोलेशन कोच तयार करण्यासाठी बाथरूम, जाण्यायेण्याचा रस्ता आणि इतर भागही व्यवस्थितपणे तयार करण्यात आले आहेत. याशिवाय बर्थवर चढण्यासठी आवश्यक असलेल्या सर्व शिड्याही काढण्यात आल्या आहेत.

अमेरिका, चीन आणि इटलीतील परिस्थिती पाहता, भारतासह सर्वच देश कोरोनाचा सामना करण्यासठी युद्ध पातळीवर तयारी करत आहेत. कोणत्या देशात, कोणत्याक्षणी परिस्थिती हाताबाहेर जाईल हे सांगता येणेही अश्यक्य आहे. त्यामुळे, बिकट परिस्थिती आलीच तर तीचा सामना करण्यासाठी सर्वच देश तयारी करत आहेत. यामुळेच मोदी सरकारलाही रेल्वेच्या कोचचे रुपांतर आयसोलेशन वार्डमध्ये करण्याची आवश्यकता भासली आहे. तसे पाहता, इतर बड्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोना पसरण्याचा वेग अद्याप फार कमी आहे. कारण येथील सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी वेळ असतानाच पावले उचलायला सुरुवात केली. संपूर्ण देशा लॉकडाउन करणे हाही याचाच एक भाग आहे.

या देशांत कोरोनाने घातलाय सर्वाधिक हाहाकार -

जगातील सर्वच देश सध्या कोरोनाचा सामना करत आहेत. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे.  तेथे 9134 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. याशिवाय चीनमध्ये 3295, अमेरिकेत 1704, स्पेनमध्ये 5138, इराणमध्ये 2378, फ्रान्समध्ये 1995 आणि जर्मनीमध्ये 391 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत  20 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जगभरातील मृतांचा आकडा 5,97,458वर -

जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 27,370 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर 5,97,458 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. मात्र असे असले तरी 1,33,373 लोक बरे होऊन घरीही परतले आहेत.

असे आणखी तीन लाख कोच तयार केले जाऊ शकतात -

देशातील कोरोना व्हायरसचे संकट पाहता सर्व प्रकारच्या प्रवासी सेवा पुरवणाऱ्या रेल्वे 14 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना रेल्वेने बोगींचे रुपांतर आयसोलेशन वार्डमध्ये केले आहे. यासंदर्भात बोलताना, गरज भासल्यास अशा स्वरुपाच्या आणखी तीन लाख आयसोलेशन कोच तयार करता येऊ शकतात, असे रेल्वेने म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत