शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 10:47 IST

Indian Railway News: भारतातील प्रवासी वाहतुकीचं सर्वात मोठं माध्यम हे रेल्वे आहे. देशभरात दररोज हजारो रेल्वेगाड्यांमधून लाखो प्रवासी ये जा करत असतात. अशा परिस्थितीत या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर असते. त्यांची एखादी चूक हजारो प्रवाशांचे प्राण संकटात आणू शकते.

भारतातील प्रवासी वाहतुकीचं सर्वात मोठं माध्यम हे रेल्वे आहे. देशभरात दररोज हजारो रेल्वेगाड्यांमधून लाखो प्रवासी ये जा करत असतात. अशा परिस्थितीत या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर असते. त्यांची एखादी चूक हजारो प्रवाशांचे प्राण संकटात आणू शकते. असाच धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. उत्तर प्रदेशमधील इटावा येथील उदी मोर स्टेशनवरील स्टेशन मास्तरला ऑन ड्युटी असताना डुलकी लागली. त्यामुळे सिग्नलची वाट पाहत पाटणा-कोटा एक्स्प्रेस स्टेशनवरच खोळंबून राहिली. या ट्रेनचा ड्रायव्हर सिग्नलची वाट पाहत जवळपास अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला. 

इटावामधील उदी मोर रेल्वे स्टेशन हे आग्रा विभागामध्ये येते. उदी मोर हे छोटं पण महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहेय इथून आग्र्यासोबत झाशी येथून प्रयागराजकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याही येथून जातात. या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, स्टेशन मास्तरला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. स्टेशन मास्तरांच्या बेफिकीरीमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. याबाबत अधिक माहिती देताना आग्रा रेल्वे विभागाचे पीआरओ प्रशस्ती श्रीवास्तव यांनी न्यूज एजन्सीला सांगितले की, आम्ही स्टेशन मास्तरांना आरोप पत्र बजावलं आहे. तसेच शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झोपी गेलेल्या स्टेशन मास्तराला जागवण्यासाठी ट्रेनच्या लोको पायलटने वारंवार हॉर्न वाजवून पाहिला. मात्र त्याला सुरुवातीला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, स्टेशन मास्तरांनी आपली चूक कबूल केली असून, त्यासाठी माफी मागितली आहे. आपण स्टेशनवर एकटेच होतो. तसेच सोबत असलेला कर्मचारी ट्रॅक निरीक्षणासाठी गेला होता, असे या स्टेशन मास्तकांनी सांगितले.  

दरम्यान, विभागीय रेल्वे व्यवस्थापक तेज प्रकास अग्रवाल यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. आमचं लक्ष्य हे ट्रेनच्या वेळेमध्ये सुधारणा करण्यावर आहे. त्यामुळए कर्मचाऱ्यांच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे या विभागातील ९० टक्के ट्रेन वेळेवर धावत असल्याचे सांगितले. या स्टेशन मास्तरांनी दाखवलेल्या बेफिकिरीमुळे इतरांच्या मेहतनीवर पाणी फिरवले. एवढंच नाही तर रेल्वे वाहतुकीसाठी धोका निर्माण केला, असे त्यांनी सांगितले.    

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेश