शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"मणिपूरमधील लढाई थांबवा, माझ्या घराला वाचवा", मीराबाई चानूची PM मोदींना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:19 IST

Mirabai Chanu Appeals to PM Modi : मीराबाई चानू हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांना भावनिक साद घातली आहे. 

mirabai chanu manipur violence : मागील जवळपास दोन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीने होरपळत आहे. राज्यातील हिंसाचार रोखण्यात अयशस्वी ठरलेले मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह राज्यपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा देखील मागील काही काळात सुरू होती. मात्र, नंतर त्या चर्चांना पूर्णविराम देत आंदोलक महिलांनी नाट्यमय घडामोडींना आमंत्रण देत राजीनामा फाडला. पण, आजतागायत मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित झाली नाही. त्यामुळे व्यथित होऊन ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकणारी मिराबाई चानू हिने पंतप्रधाननरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांना भावनिक साद घातली आहे.  वेटलिफ्टर मीराबाई चानूने एक व्हिडीओ शेअर करत मणिपूरमधील हिंसाचार रोखण्याचे आवाहन केले आहे. "मणिपूरमधील जातीय संघर्षामुळे अनेक खेळाडू प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत आणि मुलांच्या शिक्षणावरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मोठ्या संख्येने लोकांना जीव गमवावा लागला. अनेकांची घरे जाळली, मणिपूरमध्ये माझे देखील घर आहे. आता मी राज्यात नाही, मी आता अमेरिकेत असून जागतिक चॅम्पियनशिप आणि आशियाई गेम्ससाठी तयारी करत आहे. मी मणिपूरमध्ये नसले तरी हा संघर्ष कधी संपेल असा प्रश्न मला नेहमी पडतो", असे मीराबाई चानूने म्हटले आहे. 

मीराबाई चानूची PM मोदींना भावनिक सादव्हिडीओ शेअर करताना मीराबाई चानूने पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केले आहे. सरकारला आवाहन करताना तिने म्हटले, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन करते की, त्यांनी आमच्या मणिपूर राज्याला वाचवावे."

दरम्यान, मणिपूरमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा यासाठी मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचार सुरु झाला होता. राज्याच्या लोकसंख्येपैकी ५३ टक्के असलेला मैतेई समुदाय प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतो. तर नागा आणि कुकी सारख्या आदिवासी समुदायांची लोकसंख्या ४० टक्के आहे आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारMirabai Chanuमीराबाई चानूNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहprime ministerपंतप्रधान