शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Rajnath Singh : पाकिस्तानात कसं चुकून पडलं भारताचं मिसाईल? राजनाथ सिंहांनी राज्य सभेत दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:26 IST

"भारताची संरक्षण संदर्भातील प्रक्रिया आणि मानके अत्यंत उच्च दर्जाची आहेत. तसेच, सशस्त्र दल अत्यंत चांगले आणि पूर्णपणे प्रशिक्षित तसेच शिस्तबद्ध आहे."

नवी दिल्ली - भारताची क्षेपणास्त्र यंत्रणा अत्यंत सुरक्षित आहे. देशाची संरक्षण संस्था सुरक्षित प्रक्रियेला आणि मानकांना सर्वोच्च प्राधान्य देते. नुकतेच भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याची जी घटना घडली, ती चुकून घडली होती. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मंगळवारी राज्यसभेत माहिती दिली. तसेच, या घटनेसंदर्भात खेद व्यक्त करत, प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (Defense Minister Rajnath Singh)

सशस्त्र दल शिस्तबद्ध - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "भारताची संरक्षण संदर्भातील प्रक्रिया आणि मानके अत्यंत उच्च दर्जाची आहेत. तसेच, सशस्त्र दल अत्यंत चांगले आणि पूर्णपणे प्रशिक्षित तसेच शिस्तबद्ध आहे. त्यामुळे, दुर्घटनेने मिसाईल फायर होण्याच्या घटनेच्या चौकशीत काही कमी आढळून आल्यास, ती दूर करण्यास भारत वचनबद्ध आहे. देशाची मिसाइल प्रणाली अत्यंत सुरक्षित आहे.'

पाकिस्तानात पडलं होतं भारताचं मिसाईल - भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला होता की, भारताच्या या क्षेपणास्त्राने सिरसा येथून उड्डाण घेतल्याचे आम्हाला कळले होते आणि काही वेळातच त्याने आपली दिशा बदलली आणि ते पाकिस्तानच्या दिशेने वळाले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात पडले. तसेच, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले होते की, या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. मात्र, पाकिस्तानच्या लष्कराने हे क्षेपणास्त्र पाडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते पाकिस्तानी हद्दीत कोसळले.

संयुक्त चौकशीची मागणी -भारत सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने, क्षेपणास्त्र दुर्घटनेसंदर्भातील भारताच्या प्रतिसादावर आपण समाधानी नाही. क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडल्याने, भारताची अंतर्गत तपासणी पुरेशी नाही, असे म्हटले होते. याच बरोबर या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी संयुक्त तपासाची मागणीही पाकिस्तानने केली होती, पण त्यांची ही मागणी भारताने धडकावली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाPakistanपाकिस्तानIndiaभारतRajya Sabhaराज्यसभा