शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Rajnath Singh : पाकिस्तानात कसं चुकून पडलं भारताचं मिसाईल? राजनाथ सिंहांनी राज्य सभेत दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:26 IST

"भारताची संरक्षण संदर्भातील प्रक्रिया आणि मानके अत्यंत उच्च दर्जाची आहेत. तसेच, सशस्त्र दल अत्यंत चांगले आणि पूर्णपणे प्रशिक्षित तसेच शिस्तबद्ध आहे."

नवी दिल्ली - भारताची क्षेपणास्त्र यंत्रणा अत्यंत सुरक्षित आहे. देशाची संरक्षण संस्था सुरक्षित प्रक्रियेला आणि मानकांना सर्वोच्च प्राधान्य देते. नुकतेच भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याची जी घटना घडली, ती चुकून घडली होती. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मंगळवारी राज्यसभेत माहिती दिली. तसेच, या घटनेसंदर्भात खेद व्यक्त करत, प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (Defense Minister Rajnath Singh)

सशस्त्र दल शिस्तबद्ध - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "भारताची संरक्षण संदर्भातील प्रक्रिया आणि मानके अत्यंत उच्च दर्जाची आहेत. तसेच, सशस्त्र दल अत्यंत चांगले आणि पूर्णपणे प्रशिक्षित तसेच शिस्तबद्ध आहे. त्यामुळे, दुर्घटनेने मिसाईल फायर होण्याच्या घटनेच्या चौकशीत काही कमी आढळून आल्यास, ती दूर करण्यास भारत वचनबद्ध आहे. देशाची मिसाइल प्रणाली अत्यंत सुरक्षित आहे.'

पाकिस्तानात पडलं होतं भारताचं मिसाईल - भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला होता की, भारताच्या या क्षेपणास्त्राने सिरसा येथून उड्डाण घेतल्याचे आम्हाला कळले होते आणि काही वेळातच त्याने आपली दिशा बदलली आणि ते पाकिस्तानच्या दिशेने वळाले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात पडले. तसेच, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले होते की, या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. मात्र, पाकिस्तानच्या लष्कराने हे क्षेपणास्त्र पाडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते पाकिस्तानी हद्दीत कोसळले.

संयुक्त चौकशीची मागणी -भारत सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने, क्षेपणास्त्र दुर्घटनेसंदर्भातील भारताच्या प्रतिसादावर आपण समाधानी नाही. क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडल्याने, भारताची अंतर्गत तपासणी पुरेशी नाही, असे म्हटले होते. याच बरोबर या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी संयुक्त तपासाची मागणीही पाकिस्तानने केली होती, पण त्यांची ही मागणी भारताने धडकावली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाPakistanपाकिस्तानIndiaभारतRajya Sabhaराज्यसभा