शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Nirmala Sitharaman: "वस्तूंच्या किमती वाढल्या हे सत्य नाकारू शकत नाही, पण..."; अर्थमंत्री सीतारमण यांचे विरोधकांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 20:43 IST

रूपयाचे डॉलरचे तुलनेत अवमूल्यन झाले नसल्याचाही केला दावा

Nirmala Sitharaman befitting reply: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत विरोधकांच्या GST व महागाई संदर्भातील प्रश्नांवर उत्तरे दिली. यापूर्वीही खाद्यपदार्थांवर कर लावण्यात आलेत आहेत असे त्यांनी विरोधकांना लक्षात आणून दिले. तसेच महागाई मुळे वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत पण भारताची आर्थिक स्थिती इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. अर्थमंत्र्यांच्या भाषणादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहातून वॉकआउट केले. या आधी सोमवारी देखील अर्थमंत्र्यांनी लोकसभेत महागाईवरील प्रश्नांना उत्तरे दिली होती. त्यावेळीही सभागृहात अर्थमंत्र्यांनी बोलण्यास सुरुवात करताच काँग्रेसने सभागृहातून सभात्याग केला होता.

राज्यसभेत आकडेवारी सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जीएसटीपूर्वी २२ राज्यांमध्ये अनेक गोष्टींवर व्हॅट लागू करण्यात आला होता. खाद्यपदार्थांवर टॅक्स याआधी कधीच नव्हता असे म्हणणे सोपे आहे. पण असे अनेक ठिकाणी घडले आहे. वाढत्या महागाईमुळे वस्तूंची किमती दिवसेंदिवस वाढत आहेत हे सत्य आहे. आम्ही किंवा कोणीही हे सत्य नाकारू शकत नाही. किंमती वाढल्या आहेत आणि ते नाकारता येणार नाही, पण भारताची आर्थिक स्थिती अनेक देशांपेक्षा चांगली आहे. याचा अर्थ असा नाही की आपण महागाईच्या मुद्द्यापासून दूर पळत आहोत. आम्ही चर्चा करण्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येथे आहोत, असे अतिशय मुद्देसूदपणे अर्थमंत्री सीतारामन यांनी आपले मत मांडले.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेराव घालत होते. या दरम्यान अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रुपयामध्ये कोणतीही घसरण झालेली नाही. रुपया त्याच्या योग्य मार्गावर आहे. भारतीय चलनाने इतर देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. यापूर्वी, टीएमसी खासदार लुइझिन्हो फालेरो यांनी दावा केला होता की गेल्या सहा महिन्यांत रुपयाचे अवमूल्यन २८ पट किंवा ३४ टक्क्यांनी झाले आहे. पण हा दावा सीतारामन यांनी खोडून काढला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारतInflationमहागाईcongressकाँग्रेस