शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Nirmala Sitharaman: "वस्तूंच्या किमती वाढल्या हे सत्य नाकारू शकत नाही, पण..."; अर्थमंत्री सीतारमण यांचे विरोधकांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 20:43 IST

रूपयाचे डॉलरचे तुलनेत अवमूल्यन झाले नसल्याचाही केला दावा

Nirmala Sitharaman befitting reply: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत विरोधकांच्या GST व महागाई संदर्भातील प्रश्नांवर उत्तरे दिली. यापूर्वीही खाद्यपदार्थांवर कर लावण्यात आलेत आहेत असे त्यांनी विरोधकांना लक्षात आणून दिले. तसेच महागाई मुळे वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत पण भारताची आर्थिक स्थिती इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. अर्थमंत्र्यांच्या भाषणादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहातून वॉकआउट केले. या आधी सोमवारी देखील अर्थमंत्र्यांनी लोकसभेत महागाईवरील प्रश्नांना उत्तरे दिली होती. त्यावेळीही सभागृहात अर्थमंत्र्यांनी बोलण्यास सुरुवात करताच काँग्रेसने सभागृहातून सभात्याग केला होता.

राज्यसभेत आकडेवारी सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जीएसटीपूर्वी २२ राज्यांमध्ये अनेक गोष्टींवर व्हॅट लागू करण्यात आला होता. खाद्यपदार्थांवर टॅक्स याआधी कधीच नव्हता असे म्हणणे सोपे आहे. पण असे अनेक ठिकाणी घडले आहे. वाढत्या महागाईमुळे वस्तूंची किमती दिवसेंदिवस वाढत आहेत हे सत्य आहे. आम्ही किंवा कोणीही हे सत्य नाकारू शकत नाही. किंमती वाढल्या आहेत आणि ते नाकारता येणार नाही, पण भारताची आर्थिक स्थिती अनेक देशांपेक्षा चांगली आहे. याचा अर्थ असा नाही की आपण महागाईच्या मुद्द्यापासून दूर पळत आहोत. आम्ही चर्चा करण्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येथे आहोत, असे अतिशय मुद्देसूदपणे अर्थमंत्री सीतारामन यांनी आपले मत मांडले.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेराव घालत होते. या दरम्यान अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रुपयामध्ये कोणतीही घसरण झालेली नाही. रुपया त्याच्या योग्य मार्गावर आहे. भारतीय चलनाने इतर देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. यापूर्वी, टीएमसी खासदार लुइझिन्हो फालेरो यांनी दावा केला होता की गेल्या सहा महिन्यांत रुपयाचे अवमूल्यन २८ पट किंवा ३४ टक्क्यांनी झाले आहे. पण हा दावा सीतारामन यांनी खोडून काढला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारतInflationमहागाईcongressकाँग्रेस