शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मिळाले 29 कोटी; बदललं संपूर्ण आयुष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 09:39 IST

निजामाबाद गावात राहणारा शेतकरी विलास रिक्काला 2014 मध्ये दुबईला गेले होते. तेथे जाऊन त्यांनी कुली आणि ड्रायव्हरचं काम केलं.

हैदराबाद - दुष्काळ आणि कर्जाला कंटाळून तेलंगणातील शेतकरीदुबईला गेला. तेथूनही निराश होऊन तो भारतात परतला मात्र येताना त्याने काढलेल्या एका लॉटरीच्या तिकिटामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. यूएई बिग तिकिट लॉटरीमध्ये या शेतकऱ्याला 29 कोटींची लॉटरी लागली. दर महिन्याला काढण्यात येणाऱ्या या लॉटरीमध्ये शेतकऱ्याने लॉटरीचं तिकीट काढलं होतं. 

निजामाबाद गावात राहणारा शेतकरी विलास रिक्काला 2014 मध्ये दुबईला गेले होते. तेथे जाऊन त्यांनी कुली आणि ड्रायव्हरचं काम केलं. मागील महिन्यात त्यांचा व्हिसा संपल्यामुळे त्यांना भारतात परतावं लागलं. मात्र अबू धाबी सोडण्यापूर्वी विलास यांनी यूएईचं बिग तिकीट खरेदी करण्यासाठी 20 हजारांची मदत मागितली. विलासला अपेक्षा होती की त्यांचे नशीब उजळले तर त्यांचं आयुष्य बदलून जाईल या आशेने त्यांनी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं.  

शनिवारी विलास यांच्या मित्राने दुबईवरुन कॉल केला आणि त्यांना ही आनंदाची बातमी दिली. मला ही लॉटरी लागेल असा विश्वास नव्हता. आम्ही सगळे आनंदात आहोत. मी माझ्या आईला ही बातमी सांगितली तरीही तिला विश्वास होत नाही अशी प्रतिक्रिया विलास रिक्कला यांनी दिली. तसेच बक्षिसामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. मिळालेल्या रक्कमेतून मुलींना चांगलं शिक्षण देणार आहे. विलास यांना 16 वर्षाची आणि 13 वर्षाची अशा दोन मुली आहेत. 

अबू धाबी येथे इंटरनॅशनल एअरपोर्टवर दर महिन्याला ही लॉटरी काढली जाते. मूळ भारतीय लोकांमध्ये बिग तिकीट या लॉटरीचं भरपूर आकर्षण आहे. विलास यांनी या लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी 20 हजार रुपयांची रिस्क घेतली. मला ही लॉटरी लागण्याची अपेक्षा होती असं विलास यांनी सांगितले.   

टॅग्स :FarmerशेतकरीDubaiदुबई