शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 10:09 IST

फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला २३ वर्षीय शेतकरी अमृतपाल सिंह हा चुकून पाकिस्तानात गेला.

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला २३ वर्षीय शेतकरी अमृतपाल सिंह हा चुकून पाकिस्तानात गेला, त्याला आता पाकिस्तानमधील न्यायालयाने एक महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अमृतपालचे वडील जुगराज सिंह यांनी याबाबत माहिती दिली. अमृतपालच्या वडिलांनी केंद्र आणि पंजाब सरकारला त्यांच्या मुलाला भारतात परत आणण्यासाठी योग्य पावलं उचलण्याची विनंती केली आहे.

अमृतपाल सिंह हा फिरोजपूर जिल्ह्यातील खैरेच्या उत्तर गावातील रहिवासी आहे. तो २१ जून रोजी भारत-पाक सीमेजवळील त्याचं शेत पाहण्यासाठी गेला होता, जे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) देखरेखीखाली 'राणा' या सीमा चौकीजवळ काटेरी कुंपणाच्या पलीकडे आहे. संध्याकाळी ५ वाजता सीमा गेट बंद होणार होतं पण अमृतपाल परतला नाही. तो विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. 

अमृतपालकडे सुमारे ८.५ एकर जमीन आहे, जी भारतीय सीमेवर आहे. बीएसएफ जवानांना पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या काही पाऊलखुणा आढळल्या, ज्यामुळे तो अनवधानाने सीमा ओलांडून गेला असल्याचा संशय आणखी बळावला. २७ जून रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफला माहिती दिली की, अमृतपाल स्थानिक पोलिसांच्या ताब्यात आहे. 

जुगराज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना समजलं की त्यांच्या मुलाविरुद्ध पाकिस्तानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि २८ जुलै रोजी त्याला एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ५०,००० रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. जर हा दंड भरला नाही तर त्याला आणखी १५ दिवसांची शिक्षा भोगावी लागेल. वडिलांनी सरकारला आपल्या मुलाच्या लवकर परत आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानBorderसीमारेषाjailतुरुंग