शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 10:09 IST

फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला २३ वर्षीय शेतकरी अमृतपाल सिंह हा चुकून पाकिस्तानात गेला.

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला २३ वर्षीय शेतकरी अमृतपाल सिंह हा चुकून पाकिस्तानात गेला, त्याला आता पाकिस्तानमधील न्यायालयाने एक महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अमृतपालचे वडील जुगराज सिंह यांनी याबाबत माहिती दिली. अमृतपालच्या वडिलांनी केंद्र आणि पंजाब सरकारला त्यांच्या मुलाला भारतात परत आणण्यासाठी योग्य पावलं उचलण्याची विनंती केली आहे.

अमृतपाल सिंह हा फिरोजपूर जिल्ह्यातील खैरेच्या उत्तर गावातील रहिवासी आहे. तो २१ जून रोजी भारत-पाक सीमेजवळील त्याचं शेत पाहण्यासाठी गेला होता, जे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) देखरेखीखाली 'राणा' या सीमा चौकीजवळ काटेरी कुंपणाच्या पलीकडे आहे. संध्याकाळी ५ वाजता सीमा गेट बंद होणार होतं पण अमृतपाल परतला नाही. तो विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. 

अमृतपालकडे सुमारे ८.५ एकर जमीन आहे, जी भारतीय सीमेवर आहे. बीएसएफ जवानांना पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या काही पाऊलखुणा आढळल्या, ज्यामुळे तो अनवधानाने सीमा ओलांडून गेला असल्याचा संशय आणखी बळावला. २७ जून रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफला माहिती दिली की, अमृतपाल स्थानिक पोलिसांच्या ताब्यात आहे. 

जुगराज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना समजलं की त्यांच्या मुलाविरुद्ध पाकिस्तानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि २८ जुलै रोजी त्याला एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ५०,००० रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. जर हा दंड भरला नाही तर त्याला आणखी १५ दिवसांची शिक्षा भोगावी लागेल. वडिलांनी सरकारला आपल्या मुलाच्या लवकर परत आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानBorderसीमारेषाjailतुरुंग