शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:03 IST

एक प्रसिद्ध भारतीय राजनैतिक तज्ज्ञ ब्रह्मा चेल्लानी यांनी मोदी सरकारला इस्रायली हल्ल्यापासून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे...

इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणचे सर्वात मोठे अण्विक ठिकाण नतांज जवळपास पूर्णपणे नष्ट झाले आहे. याशिवाय, इराणचे अनेक वरिष्ठ अणु वैज्ञानिकही मारले गेले आहेत. या हल्ल्यात इस्रायलने लढाऊ ड्रोन शिवाय लढाऊ विमाने आणि अचूक हल्ला करणाऱ्या मिसाइल्सचाही वापर केला. मात्र, यादरम्यान इराण शत्रूला चोख उत्तर देऊ शकला नाही. यानंतर आता एक प्रसिद्ध भारतीय राजनैतिक तज्ज्ञ ब्रह्मा चेल्लानी यांनी मोदी सरकारला इस्रायली हल्ल्यापासून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले ब्रह्मा चेलानी? - ब्रह्मा चेलानी एक्सवर पोस्ट करत म्हणाले, "हवाई युद्धाच्या पहिल्या सिद्धांतानुसार इस्रायलने सुरुवातीच्या हल्ल्यात इराणची हवाई संरक्षण प्रणाली आणि बॅलेस्टिक मिसाइल लॉन्चर नष्ट केले. यामुळे, इराणची प्रत्युत्तर देण्याची क्षमता कमकुवत झाली आणि इस्रायलचा आत खोलवर मारा करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, भारताच्या राजकीय नेतृत्वाने या मूलभूत सिद्धांताकडे दुर्लक्ष केले. त्यांनी सुरुवातीला सशस्त्र दलांना केवळ पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांवरच हल्ला करण्याचे निर्देश दिले. एक असा दृष्टिकोण ज्यामुळे काही भारतीय लढाऊ विमानांचे नुकसान झाले"

 

ऑपरेशन सिंदूर दरम्यान काय घडलं? - खरे तर, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या काळात भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील किमान ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये भारताचेही नुकसान झाल्याचा दावा अनेक वृत्तांतात करण्यात आला होता. याशिवाय, पाकिस्ताननेही कुठलाही पुरावा न देता अनेक भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले होते. पण काही प्रमाणात नुकसान झाल्याचे मान्यही केले होते.

भारताच्या या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात, पाकिस्तानने शेकडो ड्रोन हल्ले करत भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय हवाई संरक्षण दलाने पाकिस्तानचे सर्वच्या सर्व हल्ले हाणून पाडले. यानंतर भारताने पाकिस्तानच्या ११ लष्करी तळांवर हल्ले करत ते नष्ट केले. यात नूर खान एअरबेसचाही समावेश होता, यालाच पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे कमांड सेंटरही म्हटले जाते. याशिवाय, भारताने केरणा हिल्सवरही बॉम्बिंग केली. यात पाकिस्तानच्या गुप्त अण्वस्त्र सुविधेचे मोठे नुकसान झाले. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIsraelइस्रायलIranइराण